Tamilnadu Shocker : भयंकर! घराला बाहेरून कडी लावून जोडप्याला जिवंत जाळले अन्... तिरुवनंतपुरममधील धक्कादायक घटना

तिरुवनंतपुरम : तामिळनाडूतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. चेंगगम जवळील पाकिरिपालयम गावात अज्ञात व्यक्तींनी एका झोपडीला बाहेरून कुलूप लावून आग लावून दिली. या भीषण आगीत ५३ वर्षीय शेतकरी आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा जागीच जळून कोळसा झाला आहे.



नेमकी घटना काय?


शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पी. शक्तिवेल (वय ५३) आणि एस. अमृतम (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. शक्तिवेल हा शेतकरी असून तो गेल्या तीन वर्षांपासून अमृतमसोबत एका शेतात बांधलेल्या लहान झोपडीत राहत होता. पहाटेच्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांना जळण्याचा उग्र वास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले, मात्र तोपर्यंत झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.



पाचवीला पुजलेले कौटुंबिक वाद


पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शक्तिवेल हा आपल्या पत्नीपासून तीन वर्षांपूर्वी विभक्त झाला होता. त्याची पत्नी आणि तीन मुले सध्या बंगळुरूमध्ये राहतात. दुसरीकडे, अमृतम ही देखील आपल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि तिलाही तीन मुले आहेत. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून 'लिव्ह-इन' मध्ये राहत होते. गुरुवारी रात्री शक्तिवेलची मुलगी त्याला भेटायला आली होती आणि जेवण करून रात्री ९ वाजता निघून गेली होती. त्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली.



पोलिसांचा तपास आणि संशय


चेंगगम पोलीस निरीक्षक एम. सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घातपाताचा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. झोपडीला बाहेरून कडी लावण्यात आली होती, जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या माजी पती-पत्नीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक