नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करायचा आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपूर विभागातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. नाशिकच्या मुक्त विद्यापीठ गेटजवळ १२०० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे शहराला पाणी कपातीचा फटका बसणार आहे. ही गळती गळती रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने रविवार, ४ जानेवारी रोजी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.


नाशिक शहरात पाइपलाइन फुटल्याने महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम ४ जानेवारीला दिवसभर सुरू राहणार असल्याने दिवसभर शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाइपलाइन दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ज्यासाठी किमान ८ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. या कामाचा फटका जास्त प्रमाणात सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी आणि सिडको या पाचही मुख्य विभागांना बसणार आहे. तर रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम चालणार असल्याने सोमवार, ५ जानेवारी रोजी सुद्धा सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.




"जलवाहिनीची गळती मोठी असल्याने तातडीने काम करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे. रविवारी दुपारचा आणि संध्याकाळचा पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवणे हिताचे ठरेल", असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे. तर सोमवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

शेतीचा कणा असलेल्या महिलांना मिळणार हक्काचा सातबारा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून विशेष अनुदानाची ग्वाही

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई : ग्रामीण

चंद्रपुरात कोळसा प्रदूषणाला बसणार चाप; विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाईंकडून 'चंद्रपूर मॉडेल'ची घोषणा!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत

हैद्राबादहून निघालेल्या विमानाचा अपघात; चाक निखळले अन् १३३ जणांचे प्राण...

फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला

एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा, महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराण विरुद्ध लढत आहे. या युद्धाने आता १२ व्या दिवसांत प्रवेश