नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करायचा आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपूर विभागातील मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. नाशिकच्या मुक्त विद्यापीठ गेटजवळ १२०० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे शहराला पाणी कपातीचा फटका बसणार आहे. ही गळती गळती रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने रविवार, ४ जानेवारी रोजी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.


नाशिक शहरात पाइपलाइन फुटल्याने महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम ४ जानेवारीला दिवसभर सुरू राहणार असल्याने दिवसभर शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाइपलाइन दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ज्यासाठी किमान ८ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. या कामाचा फटका जास्त प्रमाणात सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, पंचवटी आणि सिडको या पाचही मुख्य विभागांना बसणार आहे. तर रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम चालणार असल्याने सोमवार, ५ जानेवारी रोजी सुद्धा सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.




"जलवाहिनीची गळती मोठी असल्याने तातडीने काम करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे. रविवारी दुपारचा आणि संध्याकाळचा पुरवठा पूर्णपणे बंद असेल, तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवणे हिताचे ठरेल", असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे. तर सोमवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे