बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची बसला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये चालकासह ३२ जण प्रवास करीत होते, त्यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रकची धडक लागताच बसला आग लागली, सर्व प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. चालक आतच गुदमरून गेल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.



ओव्हरटेक करताना ट्रकला धडक, ट्रकसह बसही पेटली


अपघातात २१ जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते, अचानक आग लागल्याने आपत्कालीन दरवाजा उघडून, तर काही लोकांनी काचा फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. बसची ट्रकला जबर धडक बसल्याने चालक अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. सदरील बस लेन क्रमांक दोनमधून तीनवर जात असताना, ओव्हरटेक करत असताना धडक बसल्याने बससह ट्रकने पेट घेतला होता. सदरील वाहनांमधील आग विझववण्यात आली, पुढील तपासाची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे यांनी दिली.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली