राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण हळूहळू स्थिर होत असले, तरी थंडीचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील बहुतांश हवामान कोरडे ते ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या अवकाळी पावसाची शक्यता आहे.


कोकण किनारपट्टीवर ढग विरळ राहणार असून बहुतांश ठिकाणी आकाश स्वच्छ राहील. मुंबई, ठाणे आणि उपनगरांत सकाळच्या वेळी हलके धुके दिसू शकते. शहरात दिवसा तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर रात्रीचा गारवा वाढून किमान तापमान १८ ते २० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसली तरी सकाळच्या वेळेत दमट हवा जाणवेल.


पुणे शहरासह आसपासच्या भागांत ढगाळ वातावरण जाणवेल. पहाटे थंडी आणि धुक्याचा अनुभव येऊ शकतो. किमान तापमान १२ ते १५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता असून, कमाल तापमान २८ ते ३० अंशांदरम्यान राहील. काही ठिकाणी तुरळक हलक्या सरींची शक्यता असली तरी हवामान मुख्यतः कोरडेच राहील.



उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात हवामानात थोडी अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या भागांत ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक भागांत गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागांत किमान तापमान १० ते १४ अंशांच्या आसपास राहणार असून, सकाळी गारवा अधिक जाणवेल.


राज्यात सध्या थंडी आणि ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवत असून, पुढील काही दिवस मोठा हवामान बदल होण्याची शक्यता नाही. तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज असला, तरी गारवा कायम राहणार आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत