अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र, ‘ओह माय गॉड ३' मध्ये प्रमुख भूमिका

मुंबई: २०२६ मध्ये अभिनेता अक्षय कुमार विविध मोठ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉली एलएलबी’, ‘हाऊसफुल ५’ आणि ‘केसरी चॅप्टर ५’ या सिक्वेल चित्रपटांसह तो ‘वेलकम टू द जंगल’मधून प्रेक्षकांना हसवणार आहे. अक्षय कुमारच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून, तो पुन्हा एकदा लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणार आहे.


अक्षय कुमार ‘ओह माय गॉड ३’ च्या तिसऱ्या भागात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुखर्जी पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याची माहिती आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओह माय गॉड 3’च्या कथानकासाठी अमित राय यांनी पटकथा लिहिली असून, मागील दोन्ही भागांपेक्षा हा भाग अधिक भव्य, सध्याच्या घडामोडींशी संबंधित आणि प्रभावी असेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा या फ्रँचायझीचा भाग बनत आहे.


या तिसऱ्या भागात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबाबतची चर्चा आणखी वाढली आहे. सध्या चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन सुरू असून, लवकरच शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


‘ओह माय गॉड’चा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात १४९.९० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागाने ६० कोटींच्या बजेटमध्ये २२१.५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून