२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा


मुंबई : राज्यात दीर्घकाळाने होत असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. मात्र, यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यात सर्वपक्षीयांना, विशेषतः भाजपला यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यानुसार, २९ महानगरपालिकांमधील एकूण ८९३ प्रभाग आणि २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ८ हजार ८४० म्हणजे ३५.७ टक्के उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. सरासरी प्रत्येक जागेसाठी ५.५५ उमेदवार लढत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.


देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. येथील २२७ प्रभागांमध्ये २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाली होती. त्यापैकी २ हजार १५३ वैध ठरली, तर ४५३ उमेदवारांनी माघार घेतली. आता १ हजार ७०० उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रत्येक जागेसाठी सरासरी ७.४९ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. पुणे महानगरपालिकेतील ४१ प्रभाग आणि १६५ जागांसाठी ३ हजार ६१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार १३४ वैध ठरले, तर ९६८ जणांनी माघार घेतली आणि आता १ हजार १६६ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूरमधील ३८ प्रभाग आणि १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये अर्जांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी माघारीचे प्रमाणही मोठे (६६१) असल्याने स्पर्धा काहीशी कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९, तर पनवेलमध्ये सर्वात कमी २५५ उमेदवार रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिलपासून 'हे' नवे नियम होणार लागू

मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल-वीज प्रकल्प आणि खार्ग बेट उद्ध्वस्त करू - डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत चर्चेचे दावे सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला (Iran-US-Israel War) त्याच्या तेलसाठ्यांवर आणि

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

Iran-US-Israel War : इराणकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाला केराची टोपली

पाकिस्तानने दावा केला होता की अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी थेट चर्चेचे

Leander Paes : प्रख्यात टेनिसपटू लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भारतीय टेनिस दिग्गज लिअँडर पेसने (Leander Paes) भाजपमध्ये प्रवेश केला आहे .पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी