४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार


वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण अलीकडेच सुरू झाली आहे. ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळे वाशीयांनी आपली गुरेढोरे, कोंबड्या, कुत्रे यांच्यासह गाव सोडत सडूरे गावच्या हद्दीत, दडोबा डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या राहुट्यांत आपला संसार थाटला आहे.


वैभववाडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव असून येथे मराठा व धनगर समाजाची सुमारे ८० कुटुंबे आणि ३५० लोकसंख्या आहे. षौष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी ही गावपळण सुमारे ४५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याची माहिती गावातील जाणकार वयोवृद्धांनी दिली.


सडूरे गावच्या माळरानावर तब्बल ४० राहुट्या उभारण्यात आल्या असून प्रत्येक राहुट्यांसमोर गुरांसाठी गाताड्या बांधण्यात आल्या आहेत. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह आबालवृद्ध, कडक्याच्या थंडीतही या गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले आहेत. गावपळणी दिवशी घरातून बाहेर पडलेला दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहिले तीन दिवस कोणताही ग्रामस्थ गावाकडे फिरकत नाही. या काळात गावची प्राथमिक शाळा राहुट्यांजवळील आंब्याच्या झाडाखाली भरते, तर एस.टी. बस थांबाही तिथेच असतो. पिण्यासाठी लगतच्या शुकनदी पात्रातील झऱ्याचे पाणी वापरले जाते.आजच्या धावपळीच्या युगात शहराकडे धावणाऱ्या माणसाचे निसर्गाशी असलेले नाते तुटत असताना, शिराळे गावची गावपळण माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते घट्ट करणारी परंपरा ठरत आहे. मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून ग्रामस्थ दिवसभर गप्पागोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात, तर रात्री भजनाच्या माध्यमातून आनंद साजरा करतात.


परतीच्या दिवशी ‘घोरपी’ उत्सव


तीन दिवसांनंतर पुन्हा ग्रामदैवत गांगेश्वराला कौल लावण्यात येणार असून, देवाचा हुकूम मिळाल्यानंतर पाच किंवा सात दिवसांनी ग्रामस्थ परत गावात दाखल होतील. गावात परतण्याच्या दिवशी रात्री ‘घोरपी’ हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी नातेवाईक व मित्रपरिवार आवर्जून उपस्थित राहतात आणि सर्वांना महाप्रसाद दिला जातो.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर