इलेक्ट्रॉनिक्स ECMS योजनेतील तिसऱ्या ४१८६३ कोटींच्या टप्प्याला सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली: भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था (Ecosystem) मजबूत करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजने (Electronic Component Manufacturing Schemes ECMS) अंतर्गत प्रकल्पांच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एकूण २२ अर्जांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये ४१८६३ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक अपेक्षित आहे असे सरकारने यावेळी स्पष्ट केले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या मंजुरींची घोषणा करण्यात आली.


उपलब्ध माहितीनुसार, मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCBs), लिथियम सेल्स, कनेक्टर, कॅमेरा मॉड्यूल्स, डिस्प्ले मॉड्यूल्स, अँल्युमिनियम एक्सट्रूजन आणि मोबाइल फोन सबअसेम्बली यासह विविध महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश आहे.तिसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या कंपन्यांमध्ये वाइटल इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे, जी महाराष्ट्रात मल्टी-लेयर पीसीबी उत्पादन युनिट स्थापन करेल आणि ११० रोजगार निर्माण करेल, तसेच मदरसनचाही समावेश आहे, ज्याच्या तामिळनाडू येथील प्रकल्पामुळे ५७४१ रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


हे घटक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल उपकरणे, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक ॲप्लिकेशन्स यांसारख्या क्षेत्रांमधील देशांतर्गत मूल्य साखळी मजबूत (Global Supply Chains) करण्यासाठी आवश्यक आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा यासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.


यापूर्वी वैष्णव यांनी नोव्हेंबरमध्ये ईसीएमएस ही योजना उपकरणे ते घटक आणि उप-असेंब्लीपर्यंत मूल्य साखळीच्या एकात्मतेचा पुढील टप्पा सुरू करत आहे, ज्यामुळे भारताचे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र २०३०-३१ पर्यंत ५०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादन मूल्यापर्यंत पोहोचेल असे स्पष्ट केले होते.


केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ मार्च २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी २२,९१९ कोटी रुपयांच्या निधीसह इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला मंजुरी दिली असून इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम (ECMS) अंतर्गत सात प्रकल्पांचा पहिला टप्पा आहे. या योजनेला देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सरकारच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात २४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. हे १.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १०.३४ लाख कोटी रुपयांचे उत्पादन झाल्याचे स्पष्ट झाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Friendship Day 2026 Special : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारे बॉलीवूडचे 'हे' सुपरहिट चित्रपट, एकदा नक्की पाहाच!

मुंबई : मैत्री म्हणजे विश्वास, साथ, त्याग आणि आयुष्यभर जपला जाणारा नात्याचा धागा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी