सातारच्या ऐतिहासिक भूमीत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ

ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपरिक आठवणी


सातारा : सातारच्या ऐतिहासिक नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष श्रीमंत भोसले म्हणाले,“साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत. स्वागताची कोणतीही उणीव भासू नये, यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्वजण मनोभावे प्रयत्न करत आहोत. हे संमेलन सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरेल.


यावेळी संमेलनाचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य आणि रसीक मंडळी आलेली आहेत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. साहित्यशारदेच्या या उत्सवात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील, संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक, रसिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या. राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्र सादर केले.

Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण, तीन आरोपींना पोलीस कोठडी

ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या

Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेनंतर

Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

Monsoon News : देशात पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती