कल्याणमध्ये महायुतीत मतदानापूर्वीच विजय

भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या पाचवर


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची युती जिंकली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पॅनल क्रमांक २७ 'अ' मधून मंदा पाटील आणि पॅनल क्रमांक २४ 'ब' मधून ज्योती पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या महिला उमेदवारांचे नाव आहे.


मंदा पाटील आणि ज्योती पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात माघार घेतल्याने बिनविरोध निकाल लागले. महायुतीने या प्रभागावर संपूर्ण पकड मिळवली आहे.


शिवसेना पक्षानेदेखील मतदानापूर्वीच खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २८ मधून शिवसेनेचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. महायुतीचा महापौर बसणार, आणि त्यामध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या लक्षणीय असेल, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत आणखी काही प्रभागांमध्येही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते उत्साही आहेत. हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता आणखीन काही प्रभागात आपले खाते बिनविरोध उघडण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) तयार आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्या मुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज