Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 'साईराम ट्रॅव्हल्स' या बसला भीषण आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्यानंतर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला.



नेमकं काय घडलं?


साईराम ट्रॅव्हल्सची (Bharat Benz MH19 CX 3015) बस मुंबईकडे जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५-१६ किमी अंतरावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर ट्रक (CG04 M 8711) आल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच बसने पेट घेतला.


मृत्यूचा थरार आणि बचावकार्य


घटनेच्या वेळी बसमध्ये २ चालक, १ कंडक्टर आणि २९ प्रवासी असे एकूण ३२ जण होते. आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने ३१ जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र खामगाव (बुलढाणा) येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय ३८) यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाची तत्परता


घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. दुर्दैवाने, तोपर्यंत बसचा सांगाडाच उरला होता. सध्या माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या