Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 'साईराम ट्रॅव्हल्स' या बसला भीषण आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्यानंतर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला.



नेमकं काय घडलं?


साईराम ट्रॅव्हल्सची (Bharat Benz MH19 CX 3015) बस मुंबईकडे जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५-१६ किमी अंतरावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर ट्रक (CG04 M 8711) आल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच बसने पेट घेतला.


मृत्यूचा थरार आणि बचावकार्य


घटनेच्या वेळी बसमध्ये २ चालक, १ कंडक्टर आणि २९ प्रवासी असे एकूण ३२ जण होते. आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने ३१ जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र खामगाव (बुलढाणा) येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय ३८) यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाची तत्परता


घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. दुर्दैवाने, तोपर्यंत बसचा सांगाडाच उरला होता. सध्या माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक