Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 'साईराम ट्रॅव्हल्स' या बसला भीषण आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्यानंतर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला.



नेमकं काय घडलं?


साईराम ट्रॅव्हल्सची (Bharat Benz MH19 CX 3015) बस मुंबईकडे जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५-१६ किमी अंतरावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर ट्रक (CG04 M 8711) आल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच बसने पेट घेतला.


मृत्यूचा थरार आणि बचावकार्य


घटनेच्या वेळी बसमध्ये २ चालक, १ कंडक्टर आणि २९ प्रवासी असे एकूण ३२ जण होते. आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने ३१ जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र खामगाव (बुलढाणा) येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय ३८) यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाची तत्परता


घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. दुर्दैवाने, तोपर्यंत बसचा सांगाडाच उरला होता. सध्या माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; नवीन सीसीटीव्ही प्रकल्पातून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे.

Vasai Crime: वसईत महिलेला घरात घुसून संपवलं; नेमकं घडलं काय?

वसई: वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत एका ६० वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे.

पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक

Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'

सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी

Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका