कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन


पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे ४५० वर्षानंतर शेंदूर कवच काढण्यात आले आहे. श्री. जयति गजानन कसबा गणपती यांच्या मूर्तीवरील हे शेंदूर कवच हटवल्यानंतर तब्बल १५ व्या शतकातील मूळ मूर्ती प्रथमच भाविकांसमोर प्रकट झाली आहे. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने १५ डिसेंबरपासून ही विशेष दुरुस्ती व संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या काळात मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल ३१ डिसेंबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.


मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या प्राथमिक अभ्यासानुसार, ही मूळ मूर्ती शिवपूर्वकालीन असून तिचा कालावधी थेट १५ व्या शतकात जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील अंतिम शिक्कामोर्तब सविस्तर अहवालानंतर होणार आहे. मंदिराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर साधारण ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढण्यात आला असून, ही प्रक्रिया अत्यंत शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने पार पाडण्यात आली. गणपतीचे मुळ रूप पाहण्यासाठी भाविक आतुर आहेत.समोर आलेली मूळ मूर्ती साधारण दोन फूट उंच, चतुर्भुज असून डाव्या हातात अभय मुद्रा, उजव्या हातात आशीर्वाद मुद्रा दिसून येते. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून मोदकावर सोंड ठेवलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्धपद्मासनात विराजमान आहे. लंबकर्ण,लंबोदर ही या मूर्तीची वैशिष्ट्ये असून उजव्या बाजूस खालच्या भागात मूषक वाहन कोरलेले आहे. यासोबतच तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभारा देखील भाविकांना पाहता येणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही संपूर्ण प्रक्रिया साधारण दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात आली. २९ डिसेंबर रोजी मूळ स्वरूपातील मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठा विधी मोठ्या उत्साहात पार पडला.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या