कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन


पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे ४५० वर्षानंतर शेंदूर कवच काढण्यात आले आहे. श्री. जयति गजानन कसबा गणपती यांच्या मूर्तीवरील हे शेंदूर कवच हटवल्यानंतर तब्बल १५ व्या शतकातील मूळ मूर्ती प्रथमच भाविकांसमोर प्रकट झाली आहे. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने १५ डिसेंबरपासून ही विशेष दुरुस्ती व संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या काळात मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल ३१ डिसेंबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.


मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या प्राथमिक अभ्यासानुसार, ही मूळ मूर्ती शिवपूर्वकालीन असून तिचा कालावधी थेट १५ व्या शतकात जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील अंतिम शिक्कामोर्तब सविस्तर अहवालानंतर होणार आहे. मंदिराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर साधारण ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढण्यात आला असून, ही प्रक्रिया अत्यंत शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने पार पाडण्यात आली. गणपतीचे मुळ रूप पाहण्यासाठी भाविक आतुर आहेत.समोर आलेली मूळ मूर्ती साधारण दोन फूट उंच, चतुर्भुज असून डाव्या हातात अभय मुद्रा, उजव्या हातात आशीर्वाद मुद्रा दिसून येते. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून मोदकावर सोंड ठेवलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्धपद्मासनात विराजमान आहे. लंबकर्ण,लंबोदर ही या मूर्तीची वैशिष्ट्ये असून उजव्या बाजूस खालच्या भागात मूषक वाहन कोरलेले आहे. यासोबतच तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभारा देखील भाविकांना पाहता येणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही संपूर्ण प्रक्रिया साधारण दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात आली. २९ डिसेंबर रोजी मूळ स्वरूपातील मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठा विधी मोठ्या उत्साहात पार पडला.

Comments
Add Comment

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी