केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सिगारेट तंबाखू कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण

मोहित सोमण: केंद्र सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर ४०% अतिरिक्त भार लावण्यास मान्यता दिल्याने आज सिगरेट उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान घसरण झाली आहे. सुरूवातीच्या कलात हे शेअर १०% पर्यंत कोसळले आहेत. सकाळच्या सत्रात गॉडफ्रे फिलिप्स (७.४७%), आयटीसी (८.८८%), वीएसटी इंडस्ट्रीज (२.१९%), एनटीसी इंडस्ट्रीज (२.४०%) यांसारख्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. १ फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू होतील असे केंद्राने स्पष्ट केल्याने आज गुंतवणूकदारांनी संबंधित शेअरला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयटीसी शेअर्समध्ये तर गेल्या ६ वर्षातील सर्वाधिक घसरण झाली असून दुपारी १.०४ वाजेपर्यंत ३६५.६० पातळीवर पोहोचला आहे जो २०२३ नंतर सर्वाधिक निचांकी पातळीवर शेअर कोसळला आहे. सुरुवातील आयटीसी ६.११% कोसळला असताना गॉडफ्रे फिलिप्स तर सुरवातीच्या कलात १०% कोसळला होता. दुपारी १.०४ वाजेपर्यंत वीएसटी शेअर २.३५% कोसळला असून २५१.५० रूपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान एनटीसी शेअर दुपारी १.०४ वाजेपर्यंत २.४०% कोसळत १५९ रूपयांवर व्यवहार करत होता.


सरकारने नव्या अधिनियमानुसार तंबाखू, गुटखा, खैनी, जर्दा, सिगरेट व तत्सम वस्तूवर सीन गूड (Sin Goods) म्हणून वर्गीकरण केल्याने या वस्तूवर ४०% अतिरिक्त भार सरकार लादणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या किंमतीपेक्षा अतिरिक्त ४०% कर लावल्याने कंपनीच्या महसूलात यांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेअर्समध्ये घसरण झाली. यासह सरकारने संबंधित मशिनरी उत्पादनावर नव्या नियमानुसार अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतल्याने यांचा मोठा परिणाम बाजारातील उत्पादन व त्यावरील मार्जिनवर अपेक्षित आहे. सरकारने सप्टेंबर महिन्यातील केलेली जीएसटी कपात जीवनावश्यक वस्तूवर करताना चैनीच्या वस्तूंवर मात्र अतिरिक्त भार लावण्याचा निर्णय घेतला दरम्यान बिडीवरील १८% पातळी कायम राखण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा अंमलबजावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांना मोठ्या 'सेल ऑफ' चा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात