कुणाचा पत्ता कापला, कुणाची बंडखोरी तर कुणाचा पक्षप्रवेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्षांनी गुप्तता पाळत अधिकृत उमेदवाराची निवड जाहीर केल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बंडाचा पावित्रा घेतला. कुणी पदाचा राजीनामा दिला तर कुणी अन्य पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली, , तर कुणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. दिवसभरत हे नाराजी नाट्य सुरुच होते. त्यामुळे काही पक्षांच्या नेत्यांना आपले निर्णय बदलावे लागले तर काहींनी याची दखलही न घेता बंडखोरीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बंडोबांना थंडोबा न झाल्याने विविध पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात बंउखोरी झाल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री उशिरापर्यंत पक्षाकडून नावे जाहीर न होणे आणि अधिकृत उमेदवारीचा ए व बी फॉर्म न मिळणे यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून बंडाचे निशाण फडकावण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शाह. सुरेखा पाटील यांच्यासह माजी नगरसेविकांचा पत्ता कापला. त्यामुळे आसावरी पाटील यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक १४मधून उबाठाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. तर माटुंगा येथील नेहल शाह यांच्या प्रभाग क्रमांक १७७मधून भाजपाने अन्य उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे नेहल शाह यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कांदिवलीतील सुरेखा पाटील यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे वृत्त आहे. याशिवाय भाजपामधील इच्छुक गजेंद्र धुमाळे, दत्ता केळुसकर, जान्हवी राणे, सुप्रिया पिंपळे, कमलाकर दळवी आणि जयश्री खरात यांनीही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे.


उबाठाचे परळ येथील माजी नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिक कोकीळ यांचाही पत्ता कापल्याने त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आणि त्यांना त्यांच्या प्रभागातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १५५मधून उबाठाचे श्रीकांत शेट्ये हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक होते. परंतु त्यांना उबाठाने मंजुरी नाकारल्याने श्रीकांत नार्वेकर यांनी पत्नीसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ५६मधून उबाठाने राजुल देसाई यांना उमेदवारी न दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे समीर देसाई आणि राजुल देसाई यांनी भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. प्रभाग क्रमांक १९२ची ठाकरेंच्या युतीत मनसेला साेडण्यात आल्यामुळे मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि पक्षाच्या सरचिटणीस राहिलेल्या स्नेहल जाधव यांनी पदाचा राजीनामा देत माजी नगरसेवक सुधीर जाधव यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला.


अपक्ष उमेदवारी अर्ज भरत कुणी केली बंडखोरी




  • उबाठाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर (९५)

  • उबाठा माजी नगरसेवक कमलाकर नाईक(१६९)

  • भाजपा नगरसेविका नेहल शाह(१७७)

  • भाजपा गजेंद्र धुमाळे(२००)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील(२७)

  • भाजपा दत्ता केळुसकर(१७३)

  • भाजपा जान्हवी जगदीश राणे(२०५)

  • भाजपा सुप्रिया पिंपळे (८४)

  • उबाठा सूर्यकांत कोळी(१९३)

  • मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर (११४)

  • उबाठा श्रावणी मंदार मोरे(७४)

  • भाजपाचे कमलाकर दळवी (२२५)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री खरात(१५५)

  • भाजपाच्या गीता कुतवडे (५२)


शिंदे शिवसेनेत कोण




  • उबाठाचे प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर

  • उबाठाचे अनिल कोकिळ

  • मनसेच्या स्नेहल जाधव


भाजपात कोण




  • उबाठाचे श्रीकांत शेट्ये

  • उबाठाचे समीर देसाई


उबाठात कोण




  • भाजपा नगरसेविका आसावरी पाटील



राजीनामा




  • मनीष तिवारी, भाजपा मुलुंड

  • स्नेहल जाधव,मनसे,दादर

  • वरळी, परळ,विक्रोळी, दादरमधील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे



Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,