कुणाचा पत्ता कापला, कुणाची बंडखोरी तर कुणाचा पक्षप्रवेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्षांनी गुप्तता पाळत अधिकृत उमेदवाराची निवड जाहीर केल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी बंडाचा पावित्रा घेतला. कुणी पदाचा राजीनामा दिला तर कुणी अन्य पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली, , तर कुणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. दिवसभरत हे नाराजी नाट्य सुरुच होते. त्यामुळे काही पक्षांच्या नेत्यांना आपले निर्णय बदलावे लागले तर काहींनी याची दखलही न घेता बंडखोरीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बंडोबांना थंडोबा न झाल्याने विविध पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणात बंउखोरी झाल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री उशिरापर्यंत पक्षाकडून नावे जाहीर न होणे आणि अधिकृत उमेदवारीचा ए व बी फॉर्म न मिळणे यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून बंडाचे निशाण फडकावण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शाह. सुरेखा पाटील यांच्यासह माजी नगरसेविकांचा पत्ता कापला. त्यामुळे आसावरी पाटील यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक १४मधून उबाठाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. तर माटुंगा येथील नेहल शाह यांच्या प्रभाग क्रमांक १७७मधून भाजपाने अन्य उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे नेहल शाह यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विनंतीचा मान देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कांदिवलीतील सुरेखा पाटील यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे वृत्त आहे. याशिवाय भाजपामधील इच्छुक गजेंद्र धुमाळे, दत्ता केळुसकर, जान्हवी राणे, सुप्रिया पिंपळे, कमलाकर दळवी आणि जयश्री खरात यांनीही उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे.


उबाठाचे परळ येथील माजी नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिक कोकीळ यांचाही पत्ता कापल्याने त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आणि त्यांना त्यांच्या प्रभागातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक १५५मधून उबाठाचे श्रीकांत शेट्ये हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक होते. परंतु त्यांना उबाठाने मंजुरी नाकारल्याने श्रीकांत नार्वेकर यांनी पत्नीसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ५६मधून उबाठाने राजुल देसाई यांना उमेदवारी न दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्यामुळे समीर देसाई आणि राजुल देसाई यांनी भाजपात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. प्रभाग क्रमांक १९२ची ठाकरेंच्या युतीत मनसेला साेडण्यात आल्यामुळे मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि पक्षाच्या सरचिटणीस राहिलेल्या स्नेहल जाधव यांनी पदाचा राजीनामा देत माजी नगरसेवक सुधीर जाधव यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला.


अपक्ष उमेदवारी अर्ज भरत कुणी केली बंडखोरी




  • उबाठाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर (९५)

  • उबाठा माजी नगरसेवक कमलाकर नाईक(१६९)

  • भाजपा नगरसेविका नेहल शाह(१७७)

  • भाजपा गजेंद्र धुमाळे(२००)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील(२७)

  • भाजपा दत्ता केळुसकर(१७३)

  • भाजपा जान्हवी जगदीश राणे(२०५)

  • भाजपा सुप्रिया पिंपळे (८४)

  • उबाठा सूर्यकांत कोळी(१९३)

  • मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर (११४)

  • उबाठा श्रावणी मंदार मोरे(७४)

  • भाजपाचे कमलाकर दळवी (२२५)

  • भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री खरात(१५५)

  • भाजपाच्या गीता कुतवडे (५२)


शिंदे शिवसेनेत कोण




  • उबाठाचे प्रकाश पाटणकर आणि प्रीती पाटणकर

  • उबाठाचे अनिल कोकिळ

  • मनसेच्या स्नेहल जाधव


भाजपात कोण




  • उबाठाचे श्रीकांत शेट्ये

  • उबाठाचे समीर देसाई


उबाठात कोण




  • भाजपा नगरसेविका आसावरी पाटील



राजीनामा




  • मनीष तिवारी, भाजपा मुलुंड

  • स्नेहल जाधव,मनसे,दादर

  • वरळी, परळ,विक्रोळी, दादरमधील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे



Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील