कडोंमपा, पनवेल आणि धुळ्यात भाजपने उधळला गुलाल!

डोंबिवली: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केल्याची बातमी सकाळी मिळाली. पाठोपाठ भाजपने धुळ्यात आणि पनवेलमध्येसुद्धा खाते उघडले. धुळ्यात आणि पनवेलमध्ये भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.


आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक १८ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. दरम्यान दुसरीकडे पनवेल महापालिकाच्या प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील आणि धुळे महापालिकेतून उज्वला भोसले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.



महत्त्वाचे म्हणजे, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. तसेच पत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवून दिले.  अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.


महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सर्वच पक्षांसमोर कमी जास्त प्रमाणात बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान आहे.

Comments
Add Comment

कराचीत गॅस गळतीमुळे ३ मजली इमारत कोसळली, अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीत गॅस गळती झाली. या गॅस गळतीची तीव्रता एवढी होती

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

गडचिरोलीतले दहशतीचे शेवटचे चिन्ह हटवले

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या

आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे;मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय - आनंद परांजपे

विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही;सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकरण आणि दादांचे

वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड कायम, इटलीवर विजय

कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखत इटलीचा ४२ धावांनी पराभव केला.