नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील किल्ले, टेकड्या आणि संरक्षित वनक्षेत्रात वन विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जंगल आणि डोंगर भागात मद्यपान, गोंगाट आणि गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी बुधवारी सकाळपासूनच गस्त वाढवण्यात आलीअसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. रात्रीच्या वेळेतही अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.


सिंहगड, राजगड-तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची अशा लोकप्रिय किल्ल्यांवर ३१ डिसेंबर रोजी मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टमधील गर्दी टाळून अनेक जण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला निर्जन भागात, जंगलाच्या पायथ्याशी किंवा डोंगरदऱ्यांमध्ये तंबू टाकून रात्रभर पार्टी करण्याचा प्रयत्न करतात. काही पर्यटन कंपन्यांनी ‘निसर्गाच्या कुशीत नवीन वर्ष’ ही संकल्पना पुढे रेटल्याने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, भोर-राजगड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.


या भागांतील संरक्षित वनक्षेत्रालगत असलेल्या फार्महाऊस आणि मोकळ्या जागांवर काही ठिकाणी गेट-टुगेदर, बार्बेक्यू पार्टींचे आयोजन केले जाते. मात्र या गोंगाटाचा जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर विपरीत परिणाम होत असून, मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा जंगलात टाकणे यामुळे प्रदूषण वाढते तसेच माळरानावर वणवा लागण्याचे प्रकार घडतात. यामुळेच वन विभागाने मागील दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरला विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग असणार आहे.


नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. गडावर मांसाहार आणि मद्यपानास सक्त मनाई असतानाही काही जण दारू चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर गडावर जाणारी वाहने रोखली जातील, तर फिरायला गेलेल्या पर्यटकांनाही खाली पाठवण्यात येईल. सायंकाळी सहानंतर सिंहगड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी