कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उमेदवारांचा राजीनामा

मनसेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश


कल्याण : कल्याण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि माजी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज झालेल्या समेळ यांनी आपल्या ५० पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी सामुहिक राजीनामा दिला. समेळ यांनी मागील पंधरा वर्ष कडोंमपात नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासकामांसाठी ओळख आहेत. त्यांनी अपेक्षा केली होती की त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना उमेदवारी मिळेल, मात्र पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ही कठोर पावलं उचलली.


समेळ म्हणाले, “काहींनी स्वार्थासाठी आपल्या विषयी चुकीची माहिती नेत्यांना दिली असेल, त्यानुसार आपली उमेदवारी कापण्यात आली असेल तर ते चुकीचे आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा. आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निषेध म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देत आहोत.”


डोंबिवली : डोंबिवलीतील आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जयंता दत्तु पाटील आणि त्यांची कन्या काजल जयंता पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने तात्काळ मनसेत प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील कुटुंबासोबत ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक १९ मधून जयंता आणि काजल यांनी अर्ज दाखल केला तर पॅनल क्रमांक २२ मधून संदेश पाटील यांनीही मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

Comments
Add Comment

लाडकी बहीण योजनेतील चुकीच्या तांत्रिक माहितीमुळे लाभ थांबलेल्या महिलांना न्याय!

मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या संगमनेर

“देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते”

- राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका - देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये

संगणक परिचालकांचे मानधन १५ हजार होणार; कंत्राटी पद्धत हटवून थेट मानधन देण्याबाबत सरकार सकारात्मक

मंत्री जयकुमार गोरे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांमध्ये

Vidhan Bhavan Bomb Threat : विधानभवन उडवण्याची धमकी देणारा ई-मेल ‘फेक’

- अफवांवर विश्वास ठेवू नका; गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांचे सभागृहातून आवाहन मुंबई : विधानभवनासह

मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय

खेड ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; सरपंचांच्या खुर्चीला हादरा, विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू

- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये