कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उमेदवारांचा राजीनामा

मनसेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश


कल्याण : कल्याण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि माजी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज झालेल्या समेळ यांनी आपल्या ५० पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी सामुहिक राजीनामा दिला. समेळ यांनी मागील पंधरा वर्ष कडोंमपात नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासकामांसाठी ओळख आहेत. त्यांनी अपेक्षा केली होती की त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना उमेदवारी मिळेल, मात्र पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ही कठोर पावलं उचलली.


समेळ म्हणाले, “काहींनी स्वार्थासाठी आपल्या विषयी चुकीची माहिती नेत्यांना दिली असेल, त्यानुसार आपली उमेदवारी कापण्यात आली असेल तर ते चुकीचे आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा. आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निषेध म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देत आहोत.”


डोंबिवली : डोंबिवलीतील आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जयंता दत्तु पाटील आणि त्यांची कन्या काजल जयंता पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने तात्काळ मनसेत प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील कुटुंबासोबत ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक १९ मधून जयंता आणि काजल यांनी अर्ज दाखल केला तर पॅनल क्रमांक २२ मधून संदेश पाटील यांनीही मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

Comments
Add Comment

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य

Devendra Fadnavis: तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या