कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उमेदवारांचा राजीनामा

मनसेमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश


कल्याण : कल्याण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि माजी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांना निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज झालेल्या समेळ यांनी आपल्या ५० पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेकडून (शिंदे गट) मंगळवारी सामुहिक राजीनामा दिला. समेळ यांनी मागील पंधरा वर्ष कडोंमपात नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, प्रभावी नेतृत्व, अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासकामांसाठी ओळख आहेत. त्यांनी अपेक्षा केली होती की त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना उमेदवारी मिळेल, मात्र पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ही कठोर पावलं उचलली.


समेळ म्हणाले, “काहींनी स्वार्थासाठी आपल्या विषयी चुकीची माहिती नेत्यांना दिली असेल, त्यानुसार आपली उमेदवारी कापण्यात आली असेल तर ते चुकीचे आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी याचा विचार करावा. आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि निषेध म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देत आहोत.”


डोंबिवली : डोंबिवलीतील आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जयंता दत्तु पाटील आणि त्यांची कन्या काजल जयंता पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने तात्काळ मनसेत प्रवेश करून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाटील कुटुंबासोबत ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. पॅनल क्रमांक १९ मधून जयंता आणि काजल यांनी अर्ज दाखल केला तर पॅनल क्रमांक २२ मधून संदेश पाटील यांनीही मनसेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

Comments
Add Comment

खेड ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; सरपंचांच्या खुर्चीला हादरा, विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू

- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये

'एस.टी'च्या ताब्यातील १ हजार ५०० हेक्टर जमिनींचा विकास करून महसूल वाढवणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती; प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि स्थानिकांना रोजगार देणार मुंबई :

Yashwantrao Chavan Birth Anniversary : यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन

- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आधुनिक

विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल आला आणि पोलिसांची धावपळ झाली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या