रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.


मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.


या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाचा थरार २-० ने पिछाडीवर असताना मिळवला ३-२ ने ऐतिहासिक विजय

अटलांटा: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या बाद फेरीत इजिप्तविरुद्ध एका

Kalyan Dombivli rain : खांद्याएवढ्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची पोलिसांकडून सुटका; पडघा पोलिसांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक

Kalyan Dombivli rain : कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले

Nashik Rain : AI चा अचूक इशारा अन् टळला अनर्थ! 'भारत फोरकास्ट सिस्टम'मुळे नाशिक बचावलं

नाशिक : राज्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) अनेक भागांमध्ये पूरस्थिती (Flood Situation), दरडी कोसळण्याच्या (Landslide) घटना आणि

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Pune Palkhi 2026 : पुण्यात पालखी सोहळ्याची जय्यत तयारी; ९-१० जुलैला वाहतुकीत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पालखी सोहळ्या निमित्त १० ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज