नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच पाच दिवसांत प्रवासी संख्या २६ हजारांवर

सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू ठरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यान्वित होताच यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विमानतळ सुरू झाल्याच्या पहिल्या पाचच दिवसांत तब्बल २६ हजार २१ प्रवाशांनी येथून प्रवास केला असून, प्रवाशांचा हा उदंड प्रतिसाद विमानतळाच्या भविष्यातील यशाची नांदी मानला जात आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या पाच दिवसांत एकूण २६,०२१ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.


यामध्ये १२,४३१ आगमन आणि १३,५९० प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर लगेचच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, मागणी सातत्याने वाढत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. शनिवारी ५,५४८ तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत विमानतळावर एकूण १६२ नियोजित हवाई वाहतूक हालचाली नोंदवण्यात आल्या. यामध्ये ८१ आगमन आणि ८१ प्रस्थान उड्डाणांचा समावेश होता.


नवी मुंबई विमानतळाने घेतलेली ही झेप मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची पसंती


शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत विमानतळावर प्रवाशांचा ओघ सर्वाधिक होता. शनिवारी ५,५४८, तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मुंबई-पुण्याशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे प्रवाशांकडून या विमानतळाला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : दहशतवाद्यांचे अड्डे बनलेले मदरसे माझ्या रडारवर, मंत्री नितेश राणेंचा निर्वाणीचा इशारा

विजय मांडे, कर्जत : मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या

Nashik TCS : टीसीएस प्रकरणी दानिश शेख यांचे बँक खाते सील

नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी दानिश शेख याचे बँक खाते सील केले

Kharbao Business Park : खारबाव बिझनेस पार्क'चा विस्तार

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा संतुलित आणि आर्थिक विकास साधण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतला

MSRTC : ST BUS साठी उड्डाणपुलांखाली चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक बस अर्थात ‘लालपरी’साठी पुलांखालच्या मोकळ्या जागांचा

Sansad Ratna 2026 : ‘संसदरत्न २०२६’मध्ये महाराष्ट्राचा दबदबा

नवी दिल्ली : संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खासदारांसह ४ संसदीय स्थायी समित्यांची ‘संसदरत्न पुरस्कार

Air India : एअर इंडिया मुंबईहून देशांतर्गत उड्डाणे कमी करणार, २८० साप्ताहिक उड्डाणे करणार रद्द

मुंबई : एअर इंडिया १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत मुंबईहून २८० साप्ताहिक देशांतर्गत उड्डाणे कमी करणार. ही कंपनीकडून