नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच पाच दिवसांत प्रवासी संख्या २६ हजारांवर

सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू ठरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यान्वित होताच यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विमानतळ सुरू झाल्याच्या पहिल्या पाचच दिवसांत तब्बल २६ हजार २१ प्रवाशांनी येथून प्रवास केला असून, प्रवाशांचा हा उदंड प्रतिसाद विमानतळाच्या भविष्यातील यशाची नांदी मानला जात आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या पाच दिवसांत एकूण २६,०२१ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.


यामध्ये १२,४३१ आगमन आणि १३,५९० प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर लगेचच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, मागणी सातत्याने वाढत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. शनिवारी ५,५४८ तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत विमानतळावर एकूण १६२ नियोजित हवाई वाहतूक हालचाली नोंदवण्यात आल्या. यामध्ये ८१ आगमन आणि ८१ प्रस्थान उड्डाणांचा समावेश होता.


नवी मुंबई विमानतळाने घेतलेली ही झेप मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची पसंती


शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत विमानतळावर प्रवाशांचा ओघ सर्वाधिक होता. शनिवारी ५,५४८, तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मुंबई-पुण्याशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे प्रवाशांकडून या विमानतळाला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Gold-Silver Rate: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात २५०० रुपयांची घसरण; चांदीचे दरही घसरले

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज

उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात