नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच पाच दिवसांत प्रवासी संख्या २६ हजारांवर

सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ


नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू ठरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यान्वित होताच यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विमानतळ सुरू झाल्याच्या पहिल्या पाचच दिवसांत तब्बल २६ हजार २१ प्रवाशांनी येथून प्रवास केला असून, प्रवाशांचा हा उदंड प्रतिसाद विमानतळाच्या भविष्यातील यशाची नांदी मानला जात आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या पाच दिवसांत एकूण २६,०२१ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.


यामध्ये १२,४३१ आगमन आणि १३,५९० प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर लगेचच प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, मागणी सातत्याने वाढत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. शनिवारी ५,५४८ तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत विमानतळावर एकूण १६२ नियोजित हवाई वाहतूक हालचाली नोंदवण्यात आल्या. यामध्ये ८१ आगमन आणि ८१ प्रस्थान उड्डाणांचा समावेश होता.


नवी मुंबई विमानतळाने घेतलेली ही झेप मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.


सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची पसंती


शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांत विमानतळावर प्रवाशांचा ओघ सर्वाधिक होता. शनिवारी ५,५४८, तर रविवारी ५,६१४ प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. विमानतळाच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि मुंबई-पुण्याशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे प्रवाशांकडून या विमानतळाला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याची सखोल चौकशी करणार

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी

IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये ‘कॅप्टन्सची लढत’; हार्दिक पंड्याने स्वतःहून कर्णधारपद सोडावे; श्रीकांत यांचा सल्ला

मुंबई इंडियन्स संघाची नजर आयपीएल २०२६ च्या हंगामात सहाव्या विजेतेपदावर आहे. मात्र यंदाचा सीझन खास ठरणार आहे,

उद्धव ठाकरेंना भोंदूबाबा प्रकरणात सहआरोपी करायचे का ?

मुंबई : भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते, मात्र काँग्रेस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या

दूध भेसळखोरांना सोडणार नाही, कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध

मुंबई: राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्य शासन अत्यंत गंभीर असून, या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण

मुंबई : ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र

चोरट्यांनी बँक लुटली, रोख १३.७ लाख रुपये आणि २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या