उमेदवाराला पोहोचायला १५ मिनिटे उशीर; भाजपला मुंबईतील हक्काच्या जागेवर सोडावे लागले पाणी

मुंबई : एका उमेदवाराच्या हलगर्जीपणामुळे भाजपला मुंबईतील एका हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले आहे. संबंधित उमेदवार निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे या प्रभागात भाजपची कोंडी झाली असून, आता अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यावा लागणार आहे.


भाजपने मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड २१२ मधून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून वेळेत एबी फॉर्मही प्रदान करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे नवीन बँक खात्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्या बँकेत गेल्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेचे काम आटोपून त्या थेट प्रभाग कार्यालयात पोहोचल्या, पण तोपर्यंत मुदत संपली होती.


राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र, मंदाकिनी खामकर या प्रभाग कार्यालयात ५:१५ वाजता पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका महत्त्वाच्या जागेवर मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या