उमेदवाराला पोहोचायला १५ मिनिटे उशीर; भाजपला मुंबईतील हक्काच्या जागेवर सोडावे लागले पाणी

मुंबई : एका उमेदवाराच्या हलगर्जीपणामुळे भाजपला मुंबईतील एका हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले आहे. संबंधित उमेदवार निवडणूक कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे या प्रभागात भाजपची कोंडी झाली असून, आता अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यावा लागणार आहे.


भाजपने मंदाकिनी खामकर यांना वॉर्ड २१२ मधून उमेदवारी दिली होती आणि पक्षाकडून वेळेत एबी फॉर्मही प्रदान करण्यात आला होता. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे नवीन बँक खात्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्या बँकेत गेल्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेचे काम आटोपून त्या थेट प्रभाग कार्यालयात पोहोचल्या, पण तोपर्यंत मुदत संपली होती.


राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र, मंदाकिनी खामकर या प्रभाग कार्यालयात ५:१५ वाजता पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका महत्त्वाच्या जागेवर मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

Pune Crime : महाविद्यालयाबाहेर तरुणाचे अश्लील कृत्य; २२ वर्षीय युवक ताब्यात

पुणे : शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींकडे अश्लील हावभाव करत

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,