२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार


मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, ८९३ प्रभागांमधील २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज दाखल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक जागेवर सरासरी ११.७१ उमेदवार रिंगणात आहेत.


या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पुणे महानगरपालिकेत दिसून येत आहे. पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ३ हजार १७९ अर्ज दाखल झाले असून, प्रति जागा सरासरी १९.२७ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्याच्या जवळपास नाशिक महानगरपालिकेतही तीव्र स्पर्धा आहे. नाशिकमध्ये २ हजार ३५६ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी १९.३१ उमेदवार मैदानात आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार ८७० अर्ज दाखल झाले असून, एका जागेवर सरासरी १६.२६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जालना महानगरपालिकेत एका सर्वाधिक स्पर्धा दिसून येते आहे. येथे ६५ जागांसाठी १ हजार २६० अर्ज आले असून, प्रति प्रभाग अर्जाचे प्रमाण सरासरी १९.३८ उमेदवार इतके आहे.


दुसरीकडे, काही महानगरपालिकांमध्ये स्पर्धा तुलनेने कमी आहे. पनवेल महानगरपालिकेत ७८ जागांसाठी केवळ ३९१ अर्ज प्राप्त झाले असून, प्रति जागा सरासरी केवळ ५.०१ उमेदवार रिंगणात आहेत. इचलकरंजी (४५६ अर्ज) आणि मिरा-भाईंदर (६३२ अर्ज) येथेही कमी उमेदवार मैदानात आहेत.

मुंबईत काय स्थिती?


मुंबईतील २२७ जागांसाठी २ हजार ५१६ अर्ज दाखल झाले आहेत. यातील तब्बल २ हजार १२२ अर्ज शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर २०२५) दाखल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पक्षांतर्गत जागावाटपाच्या चर्चा शेवटपर्यंत सुरू होत्या, त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. येथे प्रत्येक प्रभागात सरासरी ११ उमेदवार रिंगणात आहेत.


कुठे किती अर्ज?


- पुणे : ३,१७९ (सर्वाधिक)
- मुंबई : २,५१६
- नाशिक : २,३५६
- पिंपरी-चिंचवड : १,९९३
- छत्रपती संभाजीनगर : १,८७०
- पनवेल : ३९१ (सर्वात कमी)

२ जानेवारीला चित्र स्पष्ट होणार


निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज माघारीची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरी केलेले किती जण अर्ज माघारी घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बंडोबांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोअर टीम कामाला लागली असून, प्रमुख महानगरपालिकांमध्ये समविचारी उमेदवारांमध्ये कमीत कमी लढत व्हावी, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या

विरोधी पक्षनेत्यालाच उबाठाने स्थायी समितीत डावलले, स्थायी आणि शिक्षण समिती सदस्यांची नावे जाहीर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी

सुधार समिती अध्यक्षपदाची माळ अमेय घोलेंच्या गळ्यात, तर बेस्ट समिती अध्यक्षपदी तृष्णा विश्वासराव?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैंकी सुधार आणि बेस्ट समितीही शिवसेनेच्या

मुंबईच्या सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर

महापालिकेच्या गटनेत्यांची नावे केली महापौरांनी जाहीर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत अखेर

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; २६ फेब्रुवारीला होणार औपचारिक घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

गांधीनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण