विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज


मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावांचा हिमालयीन टप्पा गाठण्यापासून विराट आता अवघ्या २५ धावा दूर आहे. हा टप्पा ओलांडताच विराट कोहली अशा एका विशेष क्लबमध्ये सामील होईल, जिथे आतापर्यंत जगातील केवळ दोनच फलंदाजांना पोहोचता आले आहे. विराट कोहलीने जरी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून संन्यास घेतला असला, तरी तो वनडे क्रिकेटमध्ये बॅटने चांगलीच फटकेबाजी करत आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने एकट्याने संघाची फलंदाजी सांभाळली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत ३ सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीरचा पुरस्कारही मिळाला होता. विराट कोहलीने सिद्ध केले आहे की, जरी त्याने इतर फॉरमॅटमधून संन्यास घेतला असला, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट अजूनही धावा ओकत आहे.


कोहलीचा विजयरथ सुरूच


२०२५ मध्येही विराटची बॅट धावा ओकत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा या २५ धावांकडे आणि एका ऐतिहासिक विश्वविक्रमाकडे लागल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ दोन फलंदाजांनी २८ हजार धावांचा टप्पा पार केला आहे




  • सचिन तेंडुलकर : ३४,३५७ धावा (भारत)

  • कुमार संगकारा : २८,०१६ धावा (श्रीलंका)


विराट कोहली सध्या २७,९७५ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आगामी सामन्यात केवळ २५ धावा करताच तो हा ऐतिहासिक टप्पा गाठणारा जगातील तिसरा आणि भारतातील दुसरा फलंदाज ठरेल.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या