नवी मुंबईत उबाठा नेत्यांची भाजपमध्ये उडी

भाजप-शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन


नवी मुंबई : नवी मुंबईत युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसताना उबाठा गटातील शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नामांकन दाखल करण्यास आजचा दिवस शिल्लक असताना झालेल्या या पक्षांतरामुळे निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार झाली आहे. विठ्ठल मोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर वाशी मतदारसंघातून त्यांचा मुलगा अवधूत मोरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.


दरम्यान, भाजप आणि शिवसेनेतर्फे (शिंदे गट) आज मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठाच्या तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट)उमेदवारांनीही रॅली काढत अर्ज दाखल केल्याने नवी मुंबईत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. ऐरोली, घणसोली, बेलापूर, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ परिसरात दिवसभर राजकीय हालचाली दिसून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ एका माजी नगरसेवकाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. देवदर्शन आणि समर्थकांसह रॅली काढत आपली ताकद दाखवली.


नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या २८ पॅनलमधून १११ नगरसेवकांच्या जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. युतीचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने काही प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. युती न झाल्यास उद्या आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, तसेच काही नेत्यांचे पक्षांतर होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


युतीबाबत अद्याप आशा कायम असल्याचे भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. “भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी आज चर्चा झाली असून आम्ही सकारात्मक आहोत. परिस्थिती बदलली आहे आणि आजच युतीचे चित्र स्पष्ट होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Amit Shah : विद्यार्थी आंदोलनावरील चर्चेसाठी सरकार तयार, गृहमंत्री अमित शाह देणार उत्तर; संसदेतील कोंडी सुटण्याचे संकेत

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सरकारमधील संघर्ष टोकाला ग

Nitesh Rane : दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, नाहीतर 'या' सणाच्या मुहूर्तावर सरकारकडून धमाकेदार ओवाळणी!

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी

Nitesh Rane : वंदे मातरम न म्हणणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करा

- मंत्री नितेश राणे; त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची गरज मुंबई : ज्या संस्थांमध्ये किंवा मदरशांमध्ये 'वंदे