Nitesh Rane : वंदे मातरम न म्हणणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करा

- मंत्री नितेश राणे; त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची गरज


मुंबई : ज्या संस्थांमध्ये किंवा मदरशांमध्ये 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हटले जात नाही, अशा सर्व मदरशांची नोंदणी राज्य शासनाने तातडीने रद्द केली पाहिजे, अशी भूमिका राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मांडली. या देशात राहून राष्ट्रीय घोषणा देण्यास विरोध करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसून, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, असेही ते म्हणाले. (Nitesh Rane)


भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १७ ऑगस्ट या कालावधीत देशभरात राबवल्या जाणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री राणे यांनी ही भूमिका मांडली. (Tiranga)



मंत्री नितेश राणे म्हणाले की, जो या भूमीला आपली माता मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येक नागरिक आज या रॅलीत सहभागी झाला आहे. प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान असणे अत्यंत गरजेचे आहे. देशात राहून ज्यांना 'वंदे मातरम' किंवा 'भारत माता की जय' म्हणायला संकोच वाटतो, त्यांचे या देशावर प्रेम नाही हेच सिद्ध होते. त्यामुळे अशा मनोवृत्तीच्या संस्थांवर कारवाई करत त्यांची अधिकृत नोंदणीच रद्द केली पाहिजे. आपण आपल्या देशाबद्दल आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर अत्यंत कडवट राहिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (Har Ghar Tiranga)



राजकीय मतभेद बाजूला सारून नेते एकत्र


- स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या यात्रेत विधानसभेत आणि स्थानिक राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकणारे नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असण्यापूर्वी आम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे राष्ट्र प्रथम या विचाराने आमचा तिरंगा आणि आमची निष्ठा एकच आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत.



- या भव्य तिरंगा यात्रेला आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, विशाल परब यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर जयघोषाने या वेळी संपूर्ण सावंतवाडी परिसर दुमदुमून गेला होता.

Comments
Add Comment

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Accident News : धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, पोलिसाचा मृत्यू

Dhule Solapur Accident : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री साडेबारा

US and Canada Murders : रक्ताने माखले परदेशातील पाय; अमेरिकेत आणि कॅनडात भारतीय तरुणांचे खूनी खेळ उघड

परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांशी संबंधित दोन अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Nashik Crime : नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांचं ग्रहण ! हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड

Nashik Crime News :  नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांची नजर लागल्याचं चित्र आहे. भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या