'आरपीआय'ला १५ जागांवर महायुती पाठिंबा देणार


रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद


मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर महायुतीने तातडीने दखल घेतली आहे. आरपीआयच्या नाराजीचे वृत्त समोर येताच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आठवले यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आरपीआयने स्वबळावर उतरवलेल्या ३८ उमेदवारांपैकी मेरिट असलेल्या १५ जागांवर महायुतीकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. तसेच, निवडक जागा आरपीआयला सोडण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आठवले यांची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी बैठकीनंतर दिली.


वांद्रे येथील कार्यालयात प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. अर्धा तास चालेल्या चर्चेत आरपीआयची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाच्या जागा आरपीआयला सोडण्याबाबत महायुतीत सकारात्मक विचारविनिमय सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले.


Comments
Add Comment

National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची दमदार कामगिरी; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून

FIFA World Cup : फिफा विश्वचषकात इंग्लंडचा दमदार विजय; फ्रान्सवर 6-4 मात करत तिसरे स्थान पटकावले

मायामी : फिफा विश्वचषकातील तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या रंगतदार सामन्यात इंग्लंडने फ्रान्सचा 6-4 असा पराभव करत

FIFA FINAL | मुंबईतील फुटबॉल चाहत्यांचा निकाल! अर्जेंटिना की स्पेन? कोण उचलणार विश्वचषक?

मुंबई : एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२६

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत