गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात एटीएस पथकाने छापेमारी करुन तब्बल २२ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणात एटीएसच्या पथकाने तीन आरोपींना रंगेहात पकडल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी या ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स प्रकारचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. गुजरात एटीएसच्या पथकाने राजस्थानमधील ड्रग्ज कारखान्यावर केलेल्या छापेमारीत अंशुल अनिल कुमार शास्त्री, अखिलेश कुमार पारसनाथ मौर्य, कृष्ण कुमार श्री यादव अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत.


गुजरात एटीएस पथकाने राजस्थान एसओजी, जयपूर आणि स्थानिक पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवाडी इथे एका औषध कारखान्यावर छापा टाकला. केली. गुजरात एटीएसनं खैरथल-तिजारा येथील भिवाडी गावात असलेल्या एपीएल फार्मा कंपनीवर हा छापा टाकला आहे. या कारखान्यातून तब्बल २२ किलो बेकायदेशीरपणे उत्पादित सायकोट्रॉपिक ड्रग्ज जप्त करण्यात आले. या छाप्यादरम्यान अल्प्राझोलम प्रिक्युसर केमिकल्स आणि अर्धप्रक्रिया केलेले ड्रग्ज देखील जप्त करण्यात आले.




राजस्थानमधील एका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात एटीएसने संयुक्त पद्धतीने केलेल्या छापेमारीनंतर संबंधित ठिकाणी पुर्णपणे शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या तस्करांचा आंतरराज्यीय संबंधांचा संशय एटीएसच्या पथकाला आहे. दरम्यान, जप्त केलेला ड्रग्जसाठा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. आंतरराज्यीय संबंधांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरात एटीएसने राजस्थानात छापेमारी केल्याने स्थानिक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. या तस्करांचे इतर राज्यात धागेदोरे असल्याचा संशय एटीएसच्या पथकाला आहे.


या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात एटीएसने राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मेफेड्रोन उत्पादन रॅकेटचा पर्दाफाश केला होता, मोठ्या प्रमाणात द्रव ड्रग्ज जप्त केले होते आणि अनेक आरोपींना अटक केली होती.

Comments
Add Comment

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात