मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अनुभवी, स्थानिक प्रश्नांशी जोडलेले आणि कार्यक्षम उमेदवार मैदानात उतरवून मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्थानिक विकास आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मनसेचा भर राहणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मनसेची मुंबईतील प्रभाग क्र.१९२ यशवंत किल्लेदार, प्रभाग क्र. १८३ पारूबाई कटके, प्रभाग क्र ८४ रूपाली दळवी, प्रभाग क्र १०६ सत्यवान दळवी, प्रभाग क्र. ६८ संदेश देसाई, प्रभाग क्र. २१ सोनाली मिश्रा, प्रभाग क्र.११ कविता माने, प्रभाग क्र.१५० सविता थोरवे, प्रभाग क्र. १५२ सुधांशू दुनबाळे, प्रभाग क्र ८१ शबनम शेख, प्रभाग क्र.१३३ भाग्यश्री जाधव, प्रभाग क्र. १२९ विजया गीते, प्रभाग क्रमांक १८ सदिच्छा मोरे, प्रभाग क्र.११० हरिनाक्षी मोहन चिराथ, प्रभाग क्रमांक २७ आशा चांदर या यादीतून मनसेने महिला, युवक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे स्पष्ट होते.

Comments
Add Comment

'हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हिंदूंचे सण दणक्यातच साजरे होणार’!

सांताक्रूझच्या शोभायात्रेत मंत्री नितेश राणे यांचा इशारा मुंबई : "जर त्यांच्या भागात ईदला डीजे वाजत असेल, तर

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांवर संधी मिळावी, यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

Assam Assembly Election 2026 : आसाममध्ये भाजप विजयाची हॅट्रिक करणार - पंतप्रधान मोदी

- गोगामुखच्या निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधानांचा दावा आसाममध्ये गेल्या १० वर्षांत भाजपने चांगली विकास कामे केली

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील

Maharashtra Cabinet Decisions : फडणवीस सरकारने घेतले महाराष्ट्राच्या हिताचे सहा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक महाराष्ट्राच्या हिताचे