भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक पुरुष अशा एकूण  चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.  यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले, तसेच पोलीस आणि प्रशासनाला तातडीने आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे.


बस रिव्हर्स घेताना चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचा पोलीस तपास सुरू आहे.





 
Comments
Add Comment

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या

अडीच वर्षांच्या संसारावर काळाचा घाला; पिंकी माळी यांचं विमान दुर्घटनेत निधन

मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही

महापालिकेत एमआयएमचे महत्व वाढले

सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता आली असली तरी, अवघे ८

हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार

प्रदूषणाची आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर

Ajit Pawar Passed Away : अजितदादांच्या या 'खास' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन

अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक