बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला


ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध ईशनिंदा म्हणजे धर्माचा अपमान करण्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर २०२५ दरम्यान असे ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


ही माहिती बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर काम करणाऱ्या 'ह्यूमन राइट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज' या संस्थेच्या अहवालात समोर आली आहे.


मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्यासाठी प्रत्येक वेळी एकच पद्धत वापरली जात आहे. आधी सोशल मीडियावर आरोप, मग तत्काळ अटक, त्यानंतर जमाव जमणे आणि हिंदू वस्त्यांवर हल्ला. आता ईशनिंदेचे आरोप भीती पसरवण्याचे आणि अल्पसंख्याकांना दाबण्याचे हत्यार बनत आहेत.


एचआरसीबीएमचे म्हणणे आहे की, या घटना देशातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत. एकाच प्रकारच्या इतक्या मोठ्या संख्येने घटना घडणे, यातून या केवळ तूरळक घटना नाहीत, तर अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा एक ट्रेंड बनत चालला आहे असे दर्शवते. अहवालानुसार, जसे एखाद्यावर ईशनिंदेचा आरोप लागतो, पोलीस तत्काळ कारवाई करते, परंतु त्याचबरोबर परिसरात जमाव जमतो आणि हिंसाचार सुरू होतो. अनेकदा आरोप एका व्यक्तीवर असतो; परंतु संतप्त जमाव संपूर्ण हिंदू वस्तीला शिक्षा देतो.


१९ जून २०२५ रोजी बरिसाल जिल्ह्यात २२ वर्षीय तमाल वैद्य याला पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी चांदपूरमध्ये


२४ वर्षीय शांतो सूत्रधार याच्यावर आरोप झाल्यानंतर परिसरात तणाव पसरला आणि निदर्शने झाली.२७ जुलै रोजी रंगपूर जिल्ह्यात सर्वात गंभीर घटना घडली. येथे १७ वर्षीय रंजन रॉयला अटक केल्यानंतर जमावाने हिंदूंच्या सुमारे २२ घरांची तोडफोड केली. या घटनेने हे स्पष्ट केले की, आरोप होताच परिस्थिती किती लवकर नियंत्रणाबाहेर जाते. १८ डिसेंबर २०२५रोजी मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका परिसरात३० वर्षीय दीपू चंद्र दास याला जमावाने मारहाण करून ठार केले आणि नंतर त्याच्या मृतदेहाला आग लावली. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये खुलना येथे १५ वर्षीय उत्सव मंडलवर हल्ला झाला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनांनी संपूर्ण देशात चिंता वाढवली आहे.


संस्थेचे म्हणणे आहे की, अनेक प्रकरणांची सुरुवात सोशल मीडियावरून होते. अनेकदा असे आरोप पोस्टवर केले जातात, जे बनावट असतात किंवा खाते हॅक करून टाकलेले असतात. कोणत्याही ठोस चौकशीशिवाय केवळ तोंडी आरोपांवरच गुन्हा दाखल होतो. तरीही, पोलिस जमावाच्या दबावाखाली येऊन तात्काळ कारवाई करतात. अहवालात नमूद केले आहे की या प्रकरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त आरोपी हिंदू आहेत. अनेक पीडित अल्पवयीन आहेत, ज्यांचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे.

Comments
Add Comment

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे

Massive Fire in Bangkok Bar : भर पार्टीत बारला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, तर ६० हून अधिक जखमी

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक रविवारी रात्री एका भयंकर दुर्घटनेने हादरून गेली. वीकेंडच्या पार्टीसाठी एका

America Iran War : अमेरिकेचे इराणवर १४० लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले; इराणचाही घातक पलटवार, मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला

Bangkok Bar Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; बारला आग लागून २७ जणांचा मृत्यू

बँकॉक  : थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एका बारमध्ये (Bar) भीषण आग (Fire) लागून २७ जणांचा

India-New Zealand Free Trade Agreement : भारत-न्यूझीलंड संबंधांना नवी दिशा; व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य, ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ करारावर शिक्कामोर्तब

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंडने द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन्ही

Iran vs America War : होर्मुझ सामुद्रधुनी बंद होताच अमेरिकेचा इराणवर तिसरा हल्ला

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद