चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार


नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट क्षमतेच्या दुलहस्ती स्टेज-२ जलविद्युत प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मंजुरी मिळाल्यामुळे आता बांधकामासाठी लवकरच टेंडर जारी करण्यात येणार आहे.


पाकिस्तानकडून अनेक वर्षापासून सिंधू पाणी कराराचा हवाला जात होता; परंतु भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, सिंधू जल कराराच्या निलंबनामुळे भारताला पश्चिमेकडील नद्या अधिक स्वतंत्रपणे वापरण्याची मुभा मिळाली आहे. ज्यामुळे जलसुरक्षा आणि ऊर्जा उत्पादन मजबूत होईल. चिनाब नदीचे पाणी भारत-पाकिस्तान दरम्यान १९६० च्या सिंधू जल करारानुसार वाटले जात होते आणि प्रकल्पाचे सर्व मापदंड या कराराशी सुसंगत पद्धतीने ठरवले होते. तथापि, सिंधू पाणी करार २३ एप्रिल २०२५ पासून प्रभावीपणे निलंबित करण्यात आला. या करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवर अधिकार होते, तर भारताला रावी, ब्यास आणि सतलुजवर अधिकार होते. करार निलंबित झाल्यानंतर केंद्र सरकार सिंधू खोऱ्यातील सावलकोटे, रतले, बुरसर, पाकल दुल, क्वार, किरू आणि किर्थई यांसारख्या अनेक जलविद्युत प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. दुलहस्ती स्टेज-२ हा प्रकल्प ३९० मेगावॅट क्षमतेच्या विद्यमान दुलहस्ती स्टेज-१ प्रकल्पाचा विस्तार आहे. जो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) द्वारा २००७ मध्ये सुरु केला गेला होता आणि सध्या यशस्वीपणे कार्यरत आहे. या प्रकल्पानुसार, स्टेज-१ पावर स्टेशनमधील पाणी ३,६८५ मीटर लांब आणि ८.५ मीटर व्यासाच्या स्वतंत्र सुरंगमार्फत स्टेज-२ साठी डायव्हर्ट केले जाईल, ज्यामुळे घोड्याच्या नालासारखा तलाव तयार होईल.प्रकल्पात सर्ज शाफ्ट, प्रेशर शाफ्ट आणि भूमिगत पावरहाऊस यांचा समावेश आहे, ज्यात दोन १३० मेगावॅट क्षमतेच्या युनिट्स असतील.


Comments
Add Comment

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे

Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४

IndiGo hikes Airfares : एटीएफच्या दरात वाढ झाल्याने इंडिगोने पुन्हा केली विमान भाडेवाढ; प्रवाशांना किती इंधन अधिभार भरावा लागेल?

मुंबई: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने पुन्हा एकदा विमान भाड्यात वाढ केली आहे. मध्य पूर्वेतील