BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांसारख्या खुणा झाल्या आहेत. अशातच आता खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बर याच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. एक पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.



खालिस्तानी दहशतवाद्याच्या पोस्टमध्ये काय?


या हल्ल्याची जबाबदारी एका खालिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे. त्याच्या वतीने असे लिहिले आहे की – सुखजिंदर सिंग बब्बर १ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड सेक्टर-३७ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतो. आम्ही भारतीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की, पंजाबमधील शीख तरुणांना संपवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी, दशमेश पित्याचा खालसा पंथ याला सडेतोड उत्तर देईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे- गुरदासपूरमध्ये रणजीत सिंगच्या मारेकऱ्यालाही सोडले जाणार नाही. पंजाबची भूमी खालसाची भूमी आहे. पंजाबमध्ये खलिस्तान बनेल. खलिस्तान जिंदाबाद. खालसा राज्य करेल.



नेमकं प्रकरण काय ?


चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार - पाचच्या सुमारास चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


पोलिसांकडून नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.



रणजीत सिंग कोण आहे?


२२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरदासपूरमधील एका गावात एका एएसआय आणि एका होमगार्ड जवानाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रणजीत सिंग नावाच्या तरुणाला पकडले. पोलिसांनी सांगितले होते की, त्यानेच दोघांची हत्या केली. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय हँडलर्सशी संबंध आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी रणजीतला हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. कुटुंबाचा आरोप होता की हा बनावट एन्काउंटर आहे. १२ दिवसांपर्यंत कुटुंबाने अंत्यसंस्कार केले नव्हते. या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या