BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यालयाच्या भिंतीवर ७० ते ८० छऱ्यांसारख्या खुणा झाल्या आहेत. अशातच आता खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बर याच्याकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. एक पोस्ट करत त्याने याची माहिती दिली.



खालिस्तानी दहशतवाद्याच्या पोस्टमध्ये काय?


या हल्ल्याची जबाबदारी एका खालिस्तानी दहशतवाद्याने घेतली आहे. त्याच्या वतीने असे लिहिले आहे की – सुखजिंदर सिंग बब्बर १ एप्रिल २०२६ रोजी चंदीगड सेक्टर-३७ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी घेतो. आम्ही भारतीय व्यवस्थेला सांगू इच्छितो की, पंजाबमधील शीख तरुणांना संपवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी, दशमेश पित्याचा खालसा पंथ याला सडेतोड उत्तर देईल. पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे- गुरदासपूरमध्ये रणजीत सिंगच्या मारेकऱ्यालाही सोडले जाणार नाही. पंजाबची भूमी खालसाची भूमी आहे. पंजाबमध्ये खलिस्तान बनेल. खलिस्तान जिंदाबाद. खालसा राज्य करेल.



नेमकं प्रकरण काय ?


चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाची माहिती कळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार - पाचच्या सुमारास चंदिगडच्या सेक्टर ३७ मध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


पोलिसांकडून नागरिकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. खबरींचीही मदत घेतली जात आहे.



रणजीत सिंग कोण आहे?


२२ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरदासपूरमधील एका गावात एका एएसआय आणि एका होमगार्ड जवानाची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रणजीत सिंग नावाच्या तरुणाला पकडले. पोलिसांनी सांगितले होते की, त्यानेच दोघांची हत्या केली. त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय हँडलर्सशी संबंध आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी रणजीतला हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी नेले जात असताना, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला. कुटुंबाचा आरोप होता की हा बनावट एन्काउंटर आहे. १२ दिवसांपर्यंत कुटुंबाने अंत्यसंस्कार केले नव्हते. या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दखल घेतली होती.

Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात