तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोनसह हवाई साधनांवर निर्बंध

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी (गृह) सुभाष मच्छिंद्र भगाडे यांनी ड्रोनसह विविध हवाई साधनांच्या वापरावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले आहेत.


तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हवाई हालचाल टाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा केंद्राच्या परिघातील १ किलोमीटर क्षेत्रात आरपीएएस (रिमोटली पायलटिंग एअरक्राफ्ट सिस्टीम) म्हणजेच ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हँगग्लायडिंग तसेच इतर कोणत्याही हवाई साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.


हा आदेश शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू झाला असून तो ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८