तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोनसह हवाई साधनांवर निर्बंध

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत पालघरचे अपर जिल्हादंडाधिकारी (गृह) सुभाष मच्छिंद्र भगाडे यांनी ड्रोनसह विविध हवाई साधनांच्या वापरावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले आहेत.


तारापूर अणुऊर्जा केंद्र हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण असल्याने परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हवाई हालचाल टाळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा केंद्राच्या परिघातील १ किलोमीटर क्षेत्रात आरपीएएस (रिमोटली पायलटिंग एअरक्राफ्ट सिस्टीम) म्हणजेच ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, हँगग्लायडिंग तसेच इतर कोणत्याही हवाई साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.


हा आदेश शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून लागू झाला असून तो ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी व पर्यटकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत