राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला


अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.


अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लीम भगिनींसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसचा कडाडून विरोध होता. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही त्यांची आडकाठी होती. जनतेला जे आवडते, त्यालाच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात; मग मतं कशी मिळणार?”अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेने नाकारले आहे. "लोकप्रतिनिधी त्यांच्या कामासाठी जबाबदार असतो. मग ते लोक मागत असोत किंवा नसोत. नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि देशभरातही उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याने राहुल बाबांना अजून बरेच पराभव पाहायचे आहेत, 'याकडे शहा यांनी लक्ष वेधले.


मलेरिया आजारापासून देश लवकर मुक्त हाेणार


भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत ९७ टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधील शेला येथे आयोजित भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए च्या परिषदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मिशन इंद्रधनुष यांसारख्या आरोग्य योजनांमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो