राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला


अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.


अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लीम भगिनींसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसचा कडाडून विरोध होता. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही त्यांची आडकाठी होती. जनतेला जे आवडते, त्यालाच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात; मग मतं कशी मिळणार?”अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेने नाकारले आहे. "लोकप्रतिनिधी त्यांच्या कामासाठी जबाबदार असतो. मग ते लोक मागत असोत किंवा नसोत. नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि देशभरातही उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याने राहुल बाबांना अजून बरेच पराभव पाहायचे आहेत, 'याकडे शहा यांनी लक्ष वेधले.


मलेरिया आजारापासून देश लवकर मुक्त हाेणार


भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत ९७ टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधील शेला येथे आयोजित भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए च्या परिषदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मिशन इंद्रधनुष यांसारख्या आरोग्य योजनांमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या