राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला


अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.


अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लीम भगिनींसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसचा कडाडून विरोध होता. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही त्यांची आडकाठी होती. जनतेला जे आवडते, त्यालाच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात; मग मतं कशी मिळणार?”अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेने नाकारले आहे. "लोकप्रतिनिधी त्यांच्या कामासाठी जबाबदार असतो. मग ते लोक मागत असोत किंवा नसोत. नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि देशभरातही उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याने राहुल बाबांना अजून बरेच पराभव पाहायचे आहेत, 'याकडे शहा यांनी लक्ष वेधले.


मलेरिया आजारापासून देश लवकर मुक्त हाेणार


भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत ९७ टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधील शेला येथे आयोजित भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए च्या परिषदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मिशन इंद्रधनुष यांसारख्या आरोग्य योजनांमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारताचा शेषनाग १५० ड्रोन, नवं घातक शस्त्र

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत

Crude Oil Purchases : भारताच्या कच्च्या तेलाच्या खरेदीत वाढ; आफ्रिकेसह अमेरिका, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतून कच्च्या तेलाची खरेदी वाढली

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि होर्मुज जलसंधीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर

Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

इराण-इस्त्रायल संघर्षानंतर ५२ हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल संघर्षानंतर पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा सुरू

भारतातील पहिल्या खासगी व्यावसायिक रॉकेट विक्रम १ चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील स्पेसटेक स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसच्या इन्फिनिटी