मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत!

मंत्री नितेश राणे यांचे मतदारांना आवाहन; सुरक्षित मुंबईसाठी महायुती हा सक्षम पर्याय


मुंबई : “टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीस) अलिकडे जाहीर केलेल्या अहवालानुसार हिंदू लोकसंख्या सातत्याने कमी होत असून, जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून, मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय आहे”, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी केले.


माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, मुंबई पालिका निवडणूक आम्ही कोणाला कमी लेखण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. मुंबईकरांचा विकास आणि सुरक्षा, या दोन विषयांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यासाठी निवडणूक हे एक साधन आहे. कारण, निवडणूक जिंकल्यानंतर आमचे महापौर, उपमहापौर, नगरसेवकांच्या माध्यमातून मुंबईला एक सुरक्षित शहर, विकसित शहर बनवण्याचे अधिकार आमच्याकडे येतील. ते अधिकार वापरून आम्ही मुंबईला एक हिंदुत्ववादी विचारांनीयुक्त असे सुरक्षित शहर कशाप्रकारे बनवू शकतो, या दृष्टीकोनातून आम्ही या निवडणुकीकडे पाहतो आहोत. याच विचारांच्या उमेदवारांसह आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. म्हणून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी, मुंबईचा महापौर ‘आय लव्ह महादेव’वाला बनवण्यासाठी महायुती हा सक्षम पर्याय मुंबईकरांसमोर आहे.


अलिकडे ‘टीस’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत चालल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिहादी मानसिकतेची लोकसंख्या वाढणे, ही धोक्याची घंटा आहे. आम्ही राष्ट्रभक्त विचारांची लोक आहोत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही निवडणूक मुंबईला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. बांगलादेश, लंडनसह जगातील विविध देशांत जे सुरू आहे, तो हिरवा शाप मुंबईला लागू द्यायचा नाहीये. मुंबईत फक्त ‘जय श्रीरामचे’च नारे लागले पाहिजेत, येथे ‘सर तन से जुदा’चे नारे चालणार नाहीत! हाच विचार घेऊन आम्ही मुंबईकरांसमोर जाणार आहोत, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.



मुंबईकर मतदार जिहाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार


मुंबईचा महापौर खान-पठाण, बुरखाधारी झाला तर काय अडचण आहे, असा सवाल एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केला होता. त्याला सडेतोड उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, अशाप्रकारची वक्तव्ये ही मुंबईतील हिंदू समाजाला डिवचण्यासाठी आहेत. गज्वाए-हिंद अंतर्गत या हिंदूराष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची यांची योजना आहे, त्याची सुरुवात मुंबईतून करू दाखवू, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या वक्तव्यांच्या मागे आहे. कदाचित वारिस पठाणला माहिती नसेल, असे १०० हिरवे साप ठेचत ठेचत मुंबई उभी राहिली आहे. ९२-९३ च्या दंगलीत मुंबईतील हिंदू संपवण्याचा विचार या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी केला होता. त्या सगळ्यांना ठेचत ठेचत मुंबईतील हिंदू समाज वर्षानुवर्षे इथे राहतो आहे. अशा जिहादी प्रवृत्तीच्या माणसांनी आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याला चोख प्रत्युत्तर येणाऱ्या १५ जानेवारीला मुंबईकर जनता देईल.

Comments
Add Comment

कृषी वीजपुरवठा स्वतंत्र पद्धतीने हाताळण्यासाठी निर्णय; 'एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड'कडे कारभार

महावितरणचे अखेर विभाजन मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महावितरणच्या विभाजनावर अखेर

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

Sunil Narine : जीटीविरुद्ध सुनील नरेन ऐतिहासिक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर ; २०० सामने खेळणारा पहिला विदेशी!

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज एक मोठा इतिहास घडणार आहे. आयपीएलमध्ये आज १६ मे रोजी कोतकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात