मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम


भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अद्याप ठोस दिशा मिळालेली नाही. रविवारी सकाळी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करूनही युतीबाबत निर्णय न झाल्याने, आता शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत भाजपकडून स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना स्वतंत्र निर्णय घेईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.


यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, ''दोन दिवसांपूर्वी मीरा–भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेत सन्मानपूर्वक तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर मेहता यांच्याकडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही'', असा दावाही त्यांनी केला. सरनाईक यांनी भाजपकडून मांडण्यात आलेल्या अटींवरही आक्षेप घेतला. “टाउन पार्कची जागा २००४ साली महापालिकेच्या ठरावाद्वारे ठेकेदाराला देण्यात आली होती. त्या ठरावावर नरेंद्र मेहता यांचीही सही आहे. त्यामुळे २१ वर्षांनंतर हा विषय उपस्थित करणे योग्य नाही आणि त्याचा सेना–भाजप युतीशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपने घातलेल्या दुसऱ्या अटीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत परत पाठवण्यास आम्ही तयार आहोत; मात्र भाजपनेही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले चार नगरसेवक शिवसेनेत परत पाठवावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.


राज्यात अनेक ठिकाणी भाजप–शिवसेना युती होत असताना मीरा–भाईंदरमध्ये अद्याप कोणतीही प्रगती होत नसल्याचे नमूद करत, सरनाईक म्हणाले की, याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी युतीविषयी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून कळवतो, असे सांगितले असून त्यांचा प्रतिसाद २४ तासांत अपेक्षित आहे. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत भाजपच्या उत्तराची प्रतीक्षा करून शिवसेना आपला पुढील निर्णय जाहीर करेल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.