मुंबईत फक्त 'आय लव महादेव'! नितेश राणेंनी घेतला वारिस पठाणांचा समाचार

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी, एका विधानाने मुंबईच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी 'मुस्लिम महापौर' बद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानला प्रत्युत्तर देत महाराष्ट्र राज्य मत्स्यमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी पठाण यांचा समाचार घेतला आहे. तर राणेंनी स्पष्ट सांगितले की, मुंबईत फक्त 'आय लव महादेव'च चालणार.


नितेश राणेंनी घेतला पठाणांचा समाचार

नितेश राणे म्हणाले, "वारिस पठाण हे विसरले आहेत की ते अशा हिंदू राष्ट्रात राहतात जिथे शरिया कायदा लागू नाही. येथील महापौर हिंदुत्व विचारसरणीचा असेल, कारण मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व आहे. देशात जिथे जिहादी मानसिकतेचे महापौर बनले आहेत, तिथे हिंदूंना संपवण्याचे काम झाले आहे. हिंदूंची संख्या कमी करून इस्लाम राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न झाले आहे. मात्र या प्रकारचे कोणतेच षडयंत्र वारिस पठाण किंवा त्यांच्या पाकिस्तानातील नेत्यांना आम्ही त्यांना यशस्वी करू देणार नाही." तर मुंबईची जनता हर हर महादेव म्हणणाऱ्या व्यक्तीलाच महापौर बनवेल असा विश्वास ही राणेंनी यावेळी व्यक्त केला.





वारिस पठाण काय म्हणाले?

वारिस पठाण यांनी अलिकडेच एक विधान केले होते की, असा दिवस येईल जेव्हा मुंबईचा महापौर हिजाब घातलेली महिला असेल. मुंबईत मुस्लिम महापौर का असू शकत नाही? यावर त्यांनी संविधानाचा दाखला देत युक्तीवाद केला होता. भारतीय संविधान समानतेचा पुरस्कार करते, तर खान, पठाण, शेख, कुरेशी किंवा अन्सारी महापौर का होऊ शकत नाहीत? या वक्तव्यामुळे इतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत. यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर निकाल दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १६ जानेवारी रोजी जाहीर केले जातील. यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने व्यस्त आहेत. प्रचारच्या रणधुमाळींसाठी सभांचे नियोजन लवकरच सुरू होईल. तर सध्या कोणाला उमेदवारी द्यावी? यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये