३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ३० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात उदयपूर न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधीही डिसेंबर महिन्यात त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या अर्जालाही न्यायालयाने नकार दिला आहे.


जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने तपास सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील अटक आणि अधिक चौकशीची शक्यता असून, या अवस्थेत जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, करार आणि पैशांच्या हालचालींचा तपास अद्याप सुरू असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे.


तपास पूर्ण झालेला नसल्यामुळे या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.


नेमकं प्रकरण काय आहे?


इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरोधात ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. डॉ. मुरडिया यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित बायोपिक तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता.


कटारिया यांच्या माध्यमातून २५ एप्रिल २०२४ रोजी डॉ. मुरडिया यांची मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये विक्रम भट्ट यांच्याशी भेट झाली. या भेटीत विक्रम भट्ट यांनी चित्रपट निर्मितीचे आश्वासन देत प्रकल्पासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगी या प्रकल्पात सहयोगी म्हणून सहभागी असतील, असेही सांगण्यात आले होते.


मात्र नंतर या संपूर्ण व्यवहारामागे फसवणूक असल्याचे उघड झाले. बायोपिकच्या नावाखाली डॉ. मुरडिया यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


या प्रकरणात विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांना ७ डिसेंबर रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. राजस्थान पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर ९ डिसेंबर रोजी दोघांना उदयपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणावर अद्याप विक्रम भट्ट किंवा श्वेतांबरी भट्ट यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

Monsoon Foot Care: पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्याल? फॉलो करा या सोप्या टिप्स

पावसाळ्यात पाय सतत ओले राहिल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी, खाज आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना

मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या

Smartphone Hacks : तुमच्या स्मार्टफोनमध्ये या ५ सेटिंग्स नक्की करा आणि डोळ्यांना आराम द्या

स्मार्टफोन डिस्प्ले सेटिंग्ज : ज्या तुमच्या डोळ्यांचा ताण कमी करतील.

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Hair Loss : तुम्हीही केस गळतीने त्रस्त आहात? कमी वयातच केस पातळ होतायत ?

जाणून घ्या महिला आणि पुरुषांमधील केस गळतीची मुख्य कारणे व उपाय! सध्याच्या काळात स्त्री आणि