३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ३० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात उदयपूर न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधीही डिसेंबर महिन्यात त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या अर्जालाही न्यायालयाने नकार दिला आहे.


जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने तपास सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील अटक आणि अधिक चौकशीची शक्यता असून, या अवस्थेत जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, करार आणि पैशांच्या हालचालींचा तपास अद्याप सुरू असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे.


तपास पूर्ण झालेला नसल्यामुळे या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.


नेमकं प्रकरण काय आहे?


इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरोधात ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. डॉ. मुरडिया यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित बायोपिक तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता.


कटारिया यांच्या माध्यमातून २५ एप्रिल २०२४ रोजी डॉ. मुरडिया यांची मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये विक्रम भट्ट यांच्याशी भेट झाली. या भेटीत विक्रम भट्ट यांनी चित्रपट निर्मितीचे आश्वासन देत प्रकल्पासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगी या प्रकल्पात सहयोगी म्हणून सहभागी असतील, असेही सांगण्यात आले होते.


मात्र नंतर या संपूर्ण व्यवहारामागे फसवणूक असल्याचे उघड झाले. बायोपिकच्या नावाखाली डॉ. मुरडिया यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


या प्रकरणात विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांना ७ डिसेंबर रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. राजस्थान पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर ९ डिसेंबर रोजी दोघांना उदयपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणावर अद्याप विक्रम भट्ट किंवा श्वेतांबरी भट्ट यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या