महायुती सर्वत्र समन्वयाच्या दिशेने

आघाडीत ‘घडले-िबघडले’ सुरूच!


महायुतीत २०७ जागांवर एकमत, विरोधकांच्या जागावाटपानंतर उर्वरित २० जागांवर निर्णय


मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत अनेक ठिकाणी जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून सर्वत्र नेतेमंंडळी स्थानिक पातळीवरील नेत्यांशी समन्वय साधत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही ‘घडलेय-बिघडलेय’चा प्रयोग सुरूच असल्याने गोंधळाचे चित्र आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या ७२ तासांवर आलेली असतानाच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी व निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांना महायुतीचा २०७ जागांवर जागावाटपात मनोमिलाफ झाल्याचा दिलासा मिळाला आहे. उर्वरित २० जागांचा निर्णय विरोधकांच्या जागावाटपानंतर घेतला जाणार आहे. ठाणे महापालिकेतही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यातच जमा असून केवळ तीन जागांचा निर्णय अद्याप झाला नाही.उबाठा गट आणि मनसेने एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत मतदारांना भावनिक साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरहुआ व रवी किशन मुंबईत जोरदार प्रचार करतील. मुंबईतील ज्या वॉर्डात उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे, तिथे या प्रचारकांच्या सभा व रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेनेही हाच प्लान आजमावत सिनेअभिनेता गोविंदाला मैदानात उतरवले आहे.


नवी मुंबईत अफवांच्या बाजारामुळे महायुतीत संभ्रम


संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असली तरी भाजप व शिवसेना महायुतीचे जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दर दोन तासांनी युती झाली, युती तुटली अशा नवनवीन राजकीय अफवा व चर्चा पसरत असल्याने अधिकृत घोषणेची वाट महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पाहत आहेत. शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंगचा असल्याने समसमान जागांचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसाठी, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी ४० जागा मागितल्याने नाईकांना मानणाऱ्यांना बेलापुरात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.


वसई-विरारमध्ये मनसे बविआची शिट्टी वाजविणार


वसई-विरार महापालिकेमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी एकत्र लढणार आहेत. मनसेचे उमेदवार हे बविआच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे. वसई- विरारमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत.

Comments
Add Comment

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

'हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही, हिंदूंचे सण दणक्यातच साजरे होणार’!

सांताक्रूझच्या शोभायात्रेत मंत्री नितेश राणे यांचा इशारा मुंबई : "जर त्यांच्या भागात ईदला डीजे वाजत असेल, तर