महायुती सर्वत्र समन्वयाच्या दिशेने

आघाडीत ‘घडले-िबघडले’ सुरूच!


महायुतीत २०७ जागांवर एकमत, विरोधकांच्या जागावाटपानंतर उर्वरित २० जागांवर निर्णय


मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी महायुतीत अनेक ठिकाणी जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून सर्वत्र नेतेमंंडळी स्थानिक पातळीवरील नेत्यांशी समन्वय साधत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही ‘घडलेय-बिघडलेय’चा प्रयोग सुरूच असल्याने गोंधळाचे चित्र आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या ७२ तासांवर आलेली असतानाच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी व निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांना महायुतीचा २०७ जागांवर जागावाटपात मनोमिलाफ झाल्याचा दिलासा मिळाला आहे. उर्वरित २० जागांचा निर्णय विरोधकांच्या जागावाटपानंतर घेतला जाणार आहे. ठाणे महापालिकेतही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यातच जमा असून केवळ तीन जागांचा निर्णय अद्याप झाला नाही.उबाठा गट आणि मनसेने एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत मतदारांना भावनिक साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरहुआ व रवी किशन मुंबईत जोरदार प्रचार करतील. मुंबईतील ज्या वॉर्डात उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे, तिथे या प्रचारकांच्या सभा व रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेनेही हाच प्लान आजमावत सिनेअभिनेता गोविंदाला मैदानात उतरवले आहे.


नवी मुंबईत अफवांच्या बाजारामुळे महायुतीत संभ्रम


संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असली तरी भाजप व शिवसेना महायुतीचे जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दर दोन तासांनी युती झाली, युती तुटली अशा नवनवीन राजकीय अफवा व चर्चा पसरत असल्याने अधिकृत घोषणेची वाट महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पाहत आहेत. शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंगचा असल्याने समसमान जागांचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसाठी, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी ४० जागा मागितल्याने नाईकांना मानणाऱ्यांना बेलापुरात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.


वसई-विरारमध्ये मनसे बविआची शिट्टी वाजविणार


वसई-विरार महापालिकेमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी एकत्र लढणार आहेत. मनसेचे उमेदवार हे बविआच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे. वसई- विरारमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Gold-Silver Rate: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात २५०० रुपयांची घसरण; चांदीचे दरही घसरले

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज

उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात