अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झालेली, या घटनेमध्ये ८ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला, तर ३५ वर्षाच्या महिलेला आपले प्राण गमवावे लागले .या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली असून, यामुळे अल्लू अर्जुन या अभिनेत्याच्या आयुष्यात अडचणी वाढणार शक्यता आहे.


हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी प्रकरणी १०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनसह एकूण २३ जणांविरुद्ध आरोप ठेवले आहेत.


आरोपींच्या यादीत सुपरस्टार अल्लू अर्जुनचं नाव आरोपी क्रमांक ११ म्हणून नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे संध्या थिएटरचे व्यवस्थापन आहे. मात्र,केवळ व्यवस्थापनच नाही,तर अल्लू अर्जुनचे ३ मॅनेजर, ८ बाउन्सर आणि खासगी सुरक्षा रक्षकांवरही या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?


हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर २०२४ रोजी 'पुष्पा २' प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. अल्लू अर्जुन आला त्यावेळी नियोजनाच्या अभावामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत  रेवती नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू झाला,तर तिचा ८ वर्षांचा मुलगा श्रीतेज गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर १३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला. पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी त्याची ३ तास कसून चौकशी केली होती. त्यावेळी अल्लूने आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की,"घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो आणि मला या मृत्यूची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली."


पीडित कुटुंबाला अल्लू अर्जुनच्या वडिलांकडून आर्थिक मदत


मानवतेच्या दृष्टिकोनातून 'पुष्पा २'च्या टीमने पीडित कुटुंबाला २ कोटी रुपये आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी १ कोटी रुपये, अशी एकूण ३ कोटींची मदत दिली होती.मात्र,आर्थिक मदत दिली असली तरी कायद्याच्या कचाट्यातून अभिनेता अद्याप सुटलेला नाही.

Comments
Add Comment

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

“मी काहीच केलं नाही…” — ‘तेरे नाम’च्या यशावर सलमान खानचं मोठं विधान व्हायरल मुंबई : सलमान खानची कल्ट क्लासिक

रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूचा स्पष्ट दृष्टिकोन; म्हणाली “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी

शुभारंभ शुभदिनी, नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

मुंबई : सर्जनशील मनं एकत्र आली की कलाकृतीला नवी उंची मिळते… आणि असाच एक सुंदर योग आता मराठी मनोरंजन विश्वात घडतोय!

दीपिकाच्या पोस्टवरील रणवीर सिंगची कमेंट जिंकतेय चाहत्यांची मने

मुंबई : रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो ‘परफेक्ट हसबंड गोल्स’ का आहे. पत्नी दीपिका पादुकोणच्या

कलेक्टिव स्टुडिओजच्या रॅटपॅक स्टोरीज आणि मधु मंटेनांच्या मॅड मॅन फिल्म्स यांचे दोन चित्रपटांसाठी सहकार्य

मुंबई : कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेली रॅटपॅक स्टोरीज आता एका नव्या प्रोडक्शन भागीदारीत

‘लाहोर १९४७’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर १९४७’ च्या थिएटरमधील