पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र


नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्राप्त ४५ हजार ५८८ संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत १३ हजार ३३६ दुबार मतदार आढळून आले आहेत. या दुबार मतदारांकडून त्यांनी कोणत्या एका प्रभागातील मतदार यादीतून मतदान करणार आहेत, याबाबत विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय बीएलओ पथके स्थापन करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रणालीद्वारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा मतदारसंघनिहाय यादीचे वर्गीकरण करण्यात आले. छायाचित्रांसह असलेली संभाव्य दुबार मतदारांची यादी बीएलओंकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी देण्यात आली होती. बीएलओंकडून फोटो पडताळणी, प्रभाग तपासणी, आई-वडिलांची नावे, पत्ता समान आहे की नाही यासह विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर आढळून आल्यास संबंधित मतदाराकडून कोणत्या पत्त्यावरील मतदार यादीतून मतदान करणार, याबाबत हमीपत्र घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे

Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून

Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका