मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा


मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत कोणतीही कमतरता आढळल्यास, मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला.


मुंबईतील खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे अधोरेखीत करून परिस्थिती आणखी बिघडणार नाही याची खात्री करण्यासाठी एका यंत्रणेची आवश्यकता मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ६ नोव्हेबर २०२३च्या आदेशाची आठवण करून देताना प्रामुख्याने व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वीच्या आदेशानुसार, धूळ पसरणार नाही यासाठी बांधकामस्थळांभोवती पुरेशा उंचीच्या धातूचे पत्रे लावणे, बांधकाम, रस्ते पुनर्बांधणीस्थळी सतत पाणी शिंपडणे, साठवलेल्या ढिगाऱ्यांवर आणि कचऱ्यावर, राडारोडा वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांवर आवरण घालणे यासह अन्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.


तसेच, या उपाययोजना करूनही हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा न झाल्यास बांधकामस्थळी लागणाऱ्या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता. आदेशांच्या अंमलबजावणीतील कोणत्याही त्रुटीसाठी प्रभागांचे सहाय्यक आयुक्त वैयक्तिकरित्या जबाबदार असतील आणि दोषी अधिकाऱ्यांची माहिती देण्याचे आदेशही महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. तथापि, या आदेशांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून त्याचे उल्लंघन केले आहे. परिणामी, मागील दोन वर्षांत हवा प्रदूषणाची परिस्थिती बदलेली नाही, असा ठपका मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेशात ठेवला. त्यामुळे महापालिकेकडून अशा चुका पुढेही सुरू राहिल्या, तर मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीतील चुका किंवा त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या संबंधित प्रभागाच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


मुंबई शहर उपनगरातील खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महापालिकेला धारेवर धरले होते आणि मुंबईसारख्या शहरात १,००० कोटी रुपयांचे खर्चाच्या १२५ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिल्यावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, परिस्थिती पालिकेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे ताशेरेही ओढले होते.


Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.