मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या १२८, शिवसेनेच्या ७९ जागांवर एकमत; २० जागांचा पेच कायम

२० जागांचा पेच कायम; शिवसेना आणि भाजप नेते पोहोचले एकनाथ शिंदेंच्या भेटीला


मुंबई : भाजप आणि शिवसेनेत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली जागावाटपाची चर्चा अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही पक्षांनी एकूण २०७ जागांवर एकमत दर्शवले असून, भाजप १२८ तर शिवसेना ७९ जागा लढवणार आहे. २० जागांवर अद्याप पेच कायम असल्याने, या जागांचा तोडगा काढण्यासाठी भाजप-शिवसेनेचे नेते शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले.


शनिवारी दुपारी वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना जागावाटपावर भाष्य केले. ते म्हणाले, "भाजप १२८ आणि शिवसेना ७९ अशा २०७ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित २० जागांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच तोडगा काढला जाईल. या जागांवर निर्णय घेताना समोरचा उमेदवार कोण आहे, याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. विरोधी आघाडीचा उमेदवार जर प्रबळ असेल तर त्या जागी भाजपचा की शिवसेनेचा उमेदवार उतरवायचा, हे वरिष्ठ नेते ठरवतील. गरज पडल्यास दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची अदलाबदलही केली जाईल. केवळ जागांच्या संख्याबळापेक्षा 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे निवडून येण्याची क्षमताच प्राधान्याची आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंबईतील सत्तेचा रंग बदलू पाहणाऱ्या शक्तींना परास्त करण्यासाठी महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचे साटम म्हणाले. "सर्व मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील. कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही, तर महायुती कशी जिंकते हेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्या पक्षांचे निर्णय पाहून आमचे धोरण ठरणार नाही," असेही त्यांनी नमूद केले.



गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल - राहुल शेवाळे


शिवसेना सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले, "महायुती आता फक्त जिंकण्याचे नियोजन करत आहे. गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदल करू, दोन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. मुंबईत महायुतीने किमान १५० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. पक्ष आणि जागा बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावरच आमचा फोकस आहे," असे शेवाळे म्हणाले.



२० जागांबाबत शिंदे घेणार निर्णय


रंगशारदा येथील बैठक संपल्यानंतर लगेचच भाजप-शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर पोहोचले. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्यासह इतर नेते उरलेल्या २० जागांबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर जागावाटपाचा अंतिम आकडा जाहीर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Minister of State Ramdas Athawale : जातनिहाय जनगणना होईपर्यंत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी; 'बदर समिती' बरखास्त करण्याची मुख्यमंत्र्यांकडे करणार

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Nashik : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! ‘नाफेड-NCCF’ थेट बाजारात; 'या' दिवसापासून कांदा खरेदी सुरू

Nashik Onion Farmer : मागील अनेक दिवसांपासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. योग्य

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! खारघरमध्ये महामार्गालगत महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पोलिसांकडून कसून तपास सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मुंबई-पुणे