Nitesh Rane : "जो हिंदू हित की बात करेगा..." मंत्री नितेश राणेंच्या ट्विटने विरोधकांचे धाबे दणाणले

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आता पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेतला असून, पक्षाचे फायरब्रँड नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या लढाईचे सूत्र स्पष्ट केले आहे. "जो हिन्दू हित की बात करेगा, वही 'आमची मुंबई' पर राज करेगा!!" अशा शब्दांत नितेश राणे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले असून, मुंबईची सत्ता आता केवळ हिंदूंच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्याच हाती राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



हिंदुत्वाच्या रक्षणासाठी नितेश राणे मैदानात




मंत्री नितेश राणे हे सातत्याने हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या कानाकोपऱ्यात हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आता मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा हाच मूळ मंत्र पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. "मुंबई ही हिंदूंच्या अस्मितेचे केंद्र आहे आणि येथील सत्तेवर बसण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे हिंदू समाजाच्या हितासाठी ठामपणे उभे राहतील," असा संदेश त्यांच्या ट्विटमधून मिळत आहे.



'हिंदू विरोधी' राजकारणाला लगाम


गेल्या काही वर्षांत मुंबईत ज्या प्रकारे तुष्टीकरणाचे राजकारण झाले, त्याला छेद देण्यासाठी नितेश राणे यांनी ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जाते. मवाळ हिंदुत्व आणि स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्या 'उबाठा' गटाला नितेश राणेंनी या विधानातून आरसा दाखवला आहे. ज्यांनी हिंदूंच्या सणांवर आणि अस्मितेवर संकट आणले, त्यांना आता मुंबईकर थारा देणार नाहीत, असा थेट इशाराच राणे यांनी दिला आहे.



भाजपच्या प्रचाराचे रणशिंग!


नितेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. "आम्हाला विकासही हवा आहे आणि धर्माचे रक्षणही!" हीच भावना आता मुंबईतील घराघरांत पोहोचवण्यासाठी नितेश राणे सज्ज झाले आहेत. केवळ आश्वासनं नाही तर हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा 'नवा चेहरा' म्हणून नितेश राणेंच्या या भूमिकेकडे पाहिले जात आहे.



हिंदू अस्मितेचा फॅक्टर ठरणार निर्णायक


सोशल मीडियावर राणेंचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले असून, मुंबईच्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी आता 'हिंदुत्व' हाच सर्वात मोठा फॅक्टर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला संवाद

मुंबई : वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा

बदरी-केदारसह चारधाममध्ये मोबाईल बंदी ,प्रशासनाची रील आणि फोटोवर कडक नजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी

नवी मुंबईत तिरूपती देवस्थानाला ३.६ एकर भूखंड एक रुपयात

नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक

एटीएममधून पैसे काढणे महाग होणार; 'या' बँकेकडून व्यवहार शुल्कात वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ