भाजपाध्यक्ष राज्यसभेवर जाणार, भाजपचे राज्यसभेचे नऊ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने बिहारमधून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लवकरच ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतील.


भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने बिहार, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील नऊ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपाध्यक्ष बिहारमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी तिकिटे वाटप करताना भाजपने मजबूत संघटनात्मक प्रभाव असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले आहे.





देशातील दहा राज्यांतील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. नितीन नवीन यांनी पाटण्याच्या बांकीपूर येथून पाच वेळा आमदार म्हणून काम केले आहे आणि बिहारच्या राजकारणात त्यांचे मजबूत अस्तित्व आहे. भाजपने पक्षातील एक प्रमुख व्यक्ती राहुल सिन्हा यांना पश्चिम बंगालमधून उमेदवारी दिली आहे. युवा नेते शिवेश कुमार यांनाही भाजपने बिहारमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. बिहारमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत.


पक्षाने आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही नेत्यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसाममध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होत आहेत. भाजपने ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली आहे.


भाजपने छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्या भाजप महिला मोर्चामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. छत्तीसगडमध्ये राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होत आहेत. यातील एका जागेवर भाजपच्या उमेदवार लक्ष्मी वर्मा आहेत. प्रशासकीय पार्श्वभूमी असलेले आणि पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय भाटिया यांना हरियाणामधून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणुका होत आहेत.

Comments
Add Comment

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने केले हे विक्रम

अहमदाबाद : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड असा सामना सुरू आहे. या

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशनचे फिफ्टी; न्यूझीलंडपुढे ठेवले हे लक्ष्य

अहमदाबाद: भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

भाजप उत्तर-पश्चिम महिला मोर्चातर्फे ‘तिच्या पावलात शक्ती २०२६’चे आयोजन

एक हजारांपेक्षा जास्त माता-भगिनींचा महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’मध्ये सहभाग मुंबई भाजप अध्यक्ष आमदार