मुंबई मनपा निवडणुकीसाठी शुक्रवारी सात जणांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने शुक्रवारी २६ डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ०४० अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. तर, अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी, आणि गीता गवळी यांच्यासह ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला.


महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना उमेदवारी पत्रे देण्यास मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ४ हजार १६५ उमेदवारी अर्जांचे तर, बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ उमेदवारी अर्जांचे वितरण झाले होते. तसेच, ०२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाली होते.


उमेदवारी अर्ज वितरणाच्या तिस-या दिवशी म्‍हणजे आज २६ डिसेंबर २०२५ रोजी २ हजार ०४० उमेदवारी अर्जांची वितरण झाले आहे. तर, ०७ उमेदवारी पत्र दाखल झाली आहेत. यामध्ये भायखळा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०७ मधून योगिता गवळी आणि प्रभाग क्रमांक२१२ मधून माजी नगरसेविका गीता गवळी यांनी अखिल भारतीय पक्षाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्याच इतर०७ जणांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज स्‍वीकारण्‍याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. त्‍यानुसार, आजपर्यंत एकूण मिळून ९ जणांनी आपले अर्ज सादर केले.

Comments
Add Comment

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.