मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्ष एकत्र येऊन भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्याच्या तयारीत असली तरी, प्रत्येक घटक पक्षाने मागितलेल्या जागांची अपेक्षा जास्त असल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त आहेत. तर, भाजप आणि शिवसेना यांनी आपली तयारी जोरदार ठेवली आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने सत्ता एकट्याने मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत युतीत भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागांची मागणी केली असली तरी, शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युला मागितल्यामुळे युती न होण्याची शक्यता वाढली आहे.


विरोधी पक्षाने आता आपली युक्ती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मीरा-भाईंदर नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला आव्हान देणार आहेत. यामध्ये उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीचे घटक पक्ष असतील. संख्याबळ अद्याप निश्चित झालेले नाही, पण लवकरच जाहीर केले जाईल.


मीरा-भाईंदर उबाठाचे नेते मनोज मयेकर यांनी सांगितले की, उबाठा आणि मनसे यांची युती झाली असून, उबाठा ८० आणि मनसे १५ जागा वाटप झाली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी ३८ इच्छुक असून, २०-२२ जागांची मागणी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील यांनी ४७ इच्छुक असून, ३५ जागांची मागणी आघाडीकडे केली असल्याची माहिती दिली. १२ प्रभागांमध्ये एकमत झाले असून उर्वरित १२ प्रभागांमध्ये बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी ३२ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले, पण भाजप-शिवसेना युतीबाबत अजून बोलणी झालेली नाही. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात