ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन


ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे. अन्यथा, दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे. उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनांवरील पेंडिंग ई-चलन क्लिअर करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाण्यात एका इच्छुक उमेदवाराने चक्क दीड लाख दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे.


ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना, तुमच्यावर अनधिकृत बांधकामे केल्याचा अथवा शासन व प्राधिकरणांचे अन्य कर व दंड शुल्क थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या नुसार वाहनांवरील ई-चलन देखील दंड थकीत असु नये. असा नियम आहे.


ई-चलन दंड भरला आहे की नाही, हे निवडणूक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई-चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात गर्दी होऊ लागली आहे. एका इच्छुकाने तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख ई-चलान दंड भरून आपली उमेदवारी निर्धोक केल्याचे वाहतूक विभागातील सुत्रांनी सांगितले.


दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू


उमेदवारी अर्ज भरताना वाहन संबंधित सर्व कागदपत्रे अद्ययावत असावित. अर्जांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि कागदपत्रांचीही तपासणी केली जाते. थकीत दंडामुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जे उमेदवार पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी थकीत ई-चलन दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती