जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने चाकूने लोकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य जपानमधील एका कारखान्यात झालेल्या या चाकू हल्ल्यात चौदा जण जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यासाठी हल्लेखोराने नागरिकांवर अज्ञात द्रव पदार्थ फवारल्याची माहिती आहे. जपानच्या स्थानिक वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.


अग्निशमन विभागाचे अधिकारी तोमोहारू सुगियामा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांना दुपारी ४:३० वाजता एका रबर कारखान्यातून फोन आला होता. ज्यात पाच-सहा जणांवर कोणीतरी चाकूने हल्ला केला आणि स्प्रेद्वारे कोणते तरी विषारी द्रव फवारल्याचे सांगितले गेले. ज्यातील १४ जखमींना आपत्कालीन सेवांद्वारे रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. जिथे हल्ला झाला तो रबर कारखाना योकोहामा कंपनी चालवते. जे ट्रक आणि बसेससाठी टायर तयार करतात.




दुसरीकडे जपानमध्ये हिंसक गुन्हे तुलनेने दुर्मिळ असून खून दर कमी आहे. कारण येथे हिंसेविरूद्ध कठोर कायदे आहेत. तथापि, अधूनमधून चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घटना घडतात. ज्यात २०२२ मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा समावेश आहे. तर २०२३ मध्ये झालेल्या गोळीबार आणि चाकूहल्ल्याच्या घटनेत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांचा मृत्यू झाल्याबद्दल ऑक्टोबरमध्ये एका जपानी व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.


Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ