नव्या वर्षात सोन्याचांदीत गुंतवणूक करावी की करू नये ? तज्ज्ञांचे मत काय ?


नवी दिल्ली : नाताळच्या दिवशी २४ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख ३९ हजार २५० रुपये तर २२ कॅरेटच्या एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा दर एक लाख २७ हजार ६५० रुपये आहे. तसेच एक किलो चांदीचा दर दोन लाख ३४ हजार रुपये आहे.


मागील काही वर्षे आयात - निर्यातीत डॉलर हे सर्वाधिक महत्त्वाचे चलन होते. पण आता भारत, चीन, रशियासह निवडक देशांनी कोट्यवधी रुपयांचे बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरक्षितरित्या, अचूक आणि वेगाने करायला सुरुवात केली आहे. नव्या व्यवस्थेत डॉलर ऐवजी व्यवहारात थेट गुंतलेले दोन देश आपापसांत चलन विनिमयाचा दर निश्चित करुन व्यवहार करत आहेत. यामुळे त्यांचे डॉलरवरील अवलंबित्व कमी होऊ लागले आहे. या बदलानंतर अनेक देशांनी आपापला सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात आणि कौटुंबिक कारणांमुळे चांदीच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे.


किरकोळ चढउतार वगळता २०२६ मध्ये सोनं आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढीची शक्यता आहे. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून नव्या वर्षात सोन्याचांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. थेट धातू स्वरुपात सोन्याचांदीत गुंतवणूक केल्यास गरजेच्यावेळी लगेच विक्री करुन तातडीने पैसा उभा करणे शक्य आहे. यामुळेच तज्ज्ञ नागरिकांना धातू स्वरुपात सोन्याचांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.


अस्वीकरण (Disclaimer) : बातमीतील माहिती संकलित स्वरुपाची आहे. खरेदी विक्रीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घेणे हिताचे आहे.


Comments
Add Comment

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.